शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

द्राक्ष खरेदी करताना बाजार समितीच्या परवान्याची सक्ती

By admin | Updated: December 23, 2015 01:29 IST

शेखर गायकवाड : विक्री रोखीनेच करण्याचे आवाहन

सांगली : द्राक्षबागायतदारांची फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीपूर्वी बाजार समितीचा परवाना घेण्याची गरज आहे. जे व्यापारी दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी मंगळवारी दिला. शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री रोखीनेच करावी, असे आवाहनही त्यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीच्या प्रश्नावर बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे, मिरजेचे प्रांताधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, सांगली बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती जीवन पाटील, सचिव प्रकाश पाटील, तासगाव बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले उपस्थित होते.गायकवाड म्हणाले की, सध्या द्राक्षाचा हंगाम सुरु झाला असून, शेतकऱ्यांची परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी रोखीनेच विक्री करावी. व्यापाऱ्यांनी जिल्ह्यात द्राक्ष खरेदी करण्यापूर्वी संबंधित भागातील बाजार समितीकडून परवाना घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी परवानाधारक खरेदीदारांकडेच द्राक्षाची विक्री करावी. विक्रीनंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून माल दिल्याची पोहोच तीन प्रतीत घ्यावी. यामध्ये वाहन क्रमांक, वाहन मालकांचे नाव, खरेदीदार, दलालाचे नाव आदींचा समावेश असावा. (प्रतिनिधी)करातून सूटद्राक्षबागायतदारांची लूट थांबविण्यासाठी सर्व व्यवहार बाजार समितीमध्ये करावेत. शेतकऱ्यांनी द्राक्षे आणल्यानंतर त्यास बाजार समिती कोणताही कर लावणार नाही. व्यापाऱ्यांनाही बाजार समितीमार्फत मूलभूत सुविधा देण्यात येतील. व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधूनच खरेदीचे व्यवहार करावेत, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.