शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

बिल भरूनही माधवनगर तहानलेलेच

By admin | Updated: November 17, 2014 23:20 IST

पाणी योजना खंडित : थकबाकीपोटी वीज कंपनीची कारवाई

गजानन साळुंखे- माधवनगर --माधवनगर, बुधगाव, कवलापूर, बिसूर, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी या सात गावांसाठी युती शासनाने १६ कोटी रुपये खर्चून माधवनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा ही महत्त्वाकांक्षी योजना निर्माण केली. पण योजनेच्या निर्मितीपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. ही गावे पाणीपट्टी वेळेत भरत नसल्याने लाखो रुपयांची थकबाकी आहे. या योजनेसाठी प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून वारंवार मदत केली आहे. तरीही गावच्या माथी असणारा थकबाकीचा कलंक पुसला जात नाही. माधवनगरही यापूर्वी या थकबाकीच्या यादीत आघाडीवर होते. पण गेल्या पाच वर्षात पाणीपट्टीची वसुली करणे व शासनाकडे वेळेत थकबाकी भरणे यावर ग्रामपंचायतीने विशेष लक्ष दिल्याने, माधवनगर थकबाकीदार गावांच्या यादीत नाही. एप्रिल ते आॅक्टोबर २०१४ अखेर आलेल्या पाणीपट्टीचे एकूण ८ लाख ११ हजार ६0९ रुपये असे संपूर्ण बिल ग्रामपंचायतीने भरले आहे. तरीही माधवनगरला पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.माधवनगर ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरली तरीही या योजनेतील इतर गावांची पाणीपट्टी थकबाकी मोठी आहे. या ग्रामपंचायतींची वसुलीच वेळेत होत नाही. त्यामुळे या गावांना पाणीपट्टी वेळेत भरणे शक्य होत नाही. सध्या ही थकबाकी १५ लाख आहे. महावितरण आपले वीज बिल सर्व एकरकमी घेणार, की काही सवलत ग्रामपंचायतींना मिळणार, यावरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. महावितरणने यापूर्वी सातत्याने वीज बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना दिल्या होत्या. नोटीसही दिली होती. आता प्रथम थकबाकी भरा, मग वीजपुरवठा सुरू करू, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. आज (सोमवार) दिवसभर या सातही गावात थकबाकी भरण्यासाठी धावपळ सुरू होती, पण रक्कम मोठी असल्याने पदाधिकारी चिंतेत दिसत होते. त्यातच ग्रामस्थांचीही पाण्यासाठी विचारणा होत होती. पाण्यासाठी हाल होत असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना हैराण झालेले हे पदाधिकारी आता आक्रमक झाले असून, आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत.माधवनगर ग्रामपंचायत नेहमी शंभर टक्के पाणीपट्टी भरते. एवढेच नव्हे, तर चालू महिन्याचे बिलही आम्ही त्वरित भरत आहोत. वारंवार होणारी गळती काढण्यातही ग्रामपंचायत अग्रेसर आहे. पण तांत्रिक कारणाने इतर गावांमुळे आमचा पाणीपुरवठा बंद होत आहे. माधवनगरला स्वतंत्र पाणीपुरवठा करा, आम्ही वेळेत पाणीपट्टी भरू, ही ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. इतर गावांची थकबाकी वेळेत येत नाही म्हणून आमचा पाणीपुरवठा बंद पडतो.- सौ. नंदाताई कदम, सरपंच, माधवनगर