शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

Sangli: कृष्णा नदी कोरडी, वारणा योजनेसाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार?; २५० कोटी निधीची गरज

By शीतल पाटील | Updated: October 28, 2023 17:04 IST

भविष्यात सांगली, कुपवाडकरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार

शीतल पाटीलसांगली : कृष्णा नदीचे वाढलेले प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे भविष्यात सांगली, कुपवाडकरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे. महापालिकेने वारणा नदीतून सांगली व कुपवाडला पाणी देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी २५० कोटींचा आराखडाही तयार करण्यात आला आहे; पण अद्याप हा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आलेला नाही. वारणा पाणी योजनेची गरज लक्षात घेता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.माजी मंत्री मदन पाटील यांच्या सत्ताकाळात केंद्र शासनाने यूआयडीएसएसएमटी अंतर्गत सांगली व कुपवाड या दोन शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बळकटीसाठी ७९.०२ कोटींच्या योजनेला मंजुरी दिली; पण पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली अन् मदन पाटील यांची सत्ताही गेली. त्यामुळे योजनेचे काम रखडले. नव्याने सत्तेवर आलेल्या विकास महाआघाडीने वारणा उद्भव वगळून शहरातील वितरण व्यवस्था बळकटीकरणावर भर दिला.पहिल्या टप्प्यातील निधीतून जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने कुपवाड झोनमधील कापसे वसाहत, शामनगर, गव्हर्नमेंट कॉलनी, वान्लेसवाडी व वाघमोडेनगर येथे पाण्याची टाकी, जॅकवेल ते माळबंगल्यापर्यंतची दाबनलिका, १०२ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था आदी कामे मार्च २०१४ पर्यंत पूर्ण करण्यात आली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वारणेतून पाणी न उचलता नवीन टाकी बांधणे, जलवाहिन्या टाकण्याचे काम केले.

आता पुन्हा कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडू लागले नव्हते. ऑक्टोबर महिन्यातच शहरावर पाणी टंचाईचे सावट आहे. कोयना धरणातून पाणी सोडले नाही तर तीन ते चार लाख लोकसंख्येला पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वारणा योजनेची गरज भासू लागली आहे. त्यासाठी २५३ कोटींचा आराखडाही तयार करण्यात आला आहे; पण तो अद्याप शासनाला सादर केलेला नाही.

पाणी माळबंगला केंद्रापर्यंत आणणारमदनभाऊ युवा मंचाच्या पाठपुराव्यानंतर वारणा योजनेबाबत महासभेतही ठराव झाला. खासगी कंपनीकडून २५३ कोटींचा आराखडा तयार केला जात आहे. सांगलीवाडी-समडोळी हद्दीत जॅकवेलसाठी जागाही घेण्यात आली आहे. वारणा नदीतून पाणी उचलून ते माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाणार आहे. त्यासाठी ११ किलोमीटरची जलवाहिनी टाकली जाईल. याशिवाय गावठाणमधील जुन्या जलवाहिन्या बदलून नव्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. शिवाय तीन ते चार नवीन पाण्याची टाकीचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीdroughtदुष्काळ