शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Sangli: कृष्णा नदी कोरडी, वारणा योजनेसाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार?; २५० कोटी निधीची गरज

By शीतल पाटील | Updated: October 28, 2023 17:04 IST

भविष्यात सांगली, कुपवाडकरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार

शीतल पाटीलसांगली : कृष्णा नदीचे वाढलेले प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे भविष्यात सांगली, कुपवाडकरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे. महापालिकेने वारणा नदीतून सांगली व कुपवाडला पाणी देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी २५० कोटींचा आराखडाही तयार करण्यात आला आहे; पण अद्याप हा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आलेला नाही. वारणा पाणी योजनेची गरज लक्षात घेता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.माजी मंत्री मदन पाटील यांच्या सत्ताकाळात केंद्र शासनाने यूआयडीएसएसएमटी अंतर्गत सांगली व कुपवाड या दोन शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बळकटीसाठी ७९.०२ कोटींच्या योजनेला मंजुरी दिली; पण पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली अन् मदन पाटील यांची सत्ताही गेली. त्यामुळे योजनेचे काम रखडले. नव्याने सत्तेवर आलेल्या विकास महाआघाडीने वारणा उद्भव वगळून शहरातील वितरण व्यवस्था बळकटीकरणावर भर दिला.पहिल्या टप्प्यातील निधीतून जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने कुपवाड झोनमधील कापसे वसाहत, शामनगर, गव्हर्नमेंट कॉलनी, वान्लेसवाडी व वाघमोडेनगर येथे पाण्याची टाकी, जॅकवेल ते माळबंगल्यापर्यंतची दाबनलिका, १०२ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था आदी कामे मार्च २०१४ पर्यंत पूर्ण करण्यात आली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वारणेतून पाणी न उचलता नवीन टाकी बांधणे, जलवाहिन्या टाकण्याचे काम केले.

आता पुन्हा कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडू लागले नव्हते. ऑक्टोबर महिन्यातच शहरावर पाणी टंचाईचे सावट आहे. कोयना धरणातून पाणी सोडले नाही तर तीन ते चार लाख लोकसंख्येला पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वारणा योजनेची गरज भासू लागली आहे. त्यासाठी २५३ कोटींचा आराखडाही तयार करण्यात आला आहे; पण तो अद्याप शासनाला सादर केलेला नाही.

पाणी माळबंगला केंद्रापर्यंत आणणारमदनभाऊ युवा मंचाच्या पाठपुराव्यानंतर वारणा योजनेबाबत महासभेतही ठराव झाला. खासगी कंपनीकडून २५३ कोटींचा आराखडा तयार केला जात आहे. सांगलीवाडी-समडोळी हद्दीत जॅकवेलसाठी जागाही घेण्यात आली आहे. वारणा नदीतून पाणी उचलून ते माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाणार आहे. त्यासाठी ११ किलोमीटरची जलवाहिनी टाकली जाईल. याशिवाय गावठाणमधील जुन्या जलवाहिन्या बदलून नव्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. शिवाय तीन ते चार नवीन पाण्याची टाकीचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीdroughtदुष्काळ