शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी ‘गृहमंत्री’ उतरल्या मैदानात!

By admin | Updated: October 8, 2014 23:02 IST

उमेदवारांचा भार हलका : महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; घरोघरी संपर्क अभियान सुरू

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. कमी काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, याचा प्रत्येक उमेदवार गांभीर्याने विचार करीत आहे. नेमक्या याचवेळी काही उमेदवारांच्या ‘गृहमंत्री’ मैदानात उतरल्या आहेत आणि प्रचाराची धुरा समर्थपणे खांद्यावर घेतली आहे.निवडणुकीत महिलांची मते महत्त्वाची ठरणार असल्याने महिला मतदारांशी संपर्क साधण्यासाठी बहुतांशी उमेदवारांनी स्वतंत्र महिला मंडळच कार्यान्वित केले आहे. त्यांचे घरोघरी संपर्क अभियान सुरू आहे. असे असले तरी गाफील न राहता, काही उमेदवारांच्या ‘गृहमंत्री’ मात्र प्रचाराकरिता स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. जतमध्ये काट्याची लढत आहे. तेथे प्रमुख तीन उमेदवारांच्या ‘गृहमंत्री’ प्रचारात सक्रिय आहेत. यामध्ये भाजपचे विलासराव जगताप यांच्या पत्नी उर्मिलाताई, काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्या पत्नी वर्षाताई आणि राष्ट्रवादीचे प्रकाश शेंडगे यांच्या पत्नी रेणुकाताई यांचा समावेश आहे. शिराळा मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्या पत्नी सुनंदाताई, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्या पत्नी रेणुकादेवी आणि राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांच्या पत्नी सुनीतादेवी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. खानापूर मतदारसंघातही शिवसेनेचे अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई, काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई आणि राष्ट्रवादीचे अमरसिंह देशमुख यांच्या पत्नी सुषमादेवी यांनी नियोजनबध्दरित्या प्रचार सुरू केला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपचे अजितराव घोरपडे यांच्या पत्नी जयमाला यांनीदेखील प्रचारात लक्ष घातले आहे. सांगलीमध्ये काँग्रेसचे मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई यांनी घरोघरी संपर्क साधण्याला महत्त्व दिले आहे. (वार्ताहर)कुटुंब रंगलंय प्रचारातबहुतांशी उमेदवारांच्या केवळ ‘गृहमंत्री’ नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच प्रचारकार्यात रंगल्याचे चित्र आहे. उमेदवारांच्या घरी अनेक कार्यकर्त्यांचा राबता असतो. प्रचार करून थकलेल्या कार्यकर्त्यांसाठी चहा- पाणी, नाष्टा प्रसंगी भोजन व्यवस्था पाहण्याचे कार्य कुटुंबातील सदस्य करत आहेत. हळदी-कुंकू, प्रचारफेऱ्या...महिला मतदारांशी संवाद साधण्यासाठी उमेदवारांच्या ‘गृह’मंत्र्यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मतदारसंघात ठिकठिकाणी हळदी-कुंकवाचा समारंभ आयोजित करण्यात येत आहे. सकाळ, संध्याकाळ पदयात्रा काढण्यात येत आहेत. कोपरा सभांचेही आयोजन करण्यात येत आहे.