शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

सांगलीत काळया खणीचा इतिहासाचा फलक झळकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 11:25 IST

Muncipal Corporation Water Sangli- सुशोभिकरण करत असताना काळया खणीचा इतिहासाचा फलक सांगलीतील आपटा पोलीस चौकी ते पुष्पराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दोनशे वर्ष जुन्या असलेल्या काळी खणीवर महापालिकेने लावला आहे. या फलकामुळे नागरिकांचे याकडे लक्ष वेधले जात आहे.

ठळक मुद्देसांगलीत काळया खणीचा इतिहासाचा फलक झळकलामहापालिकेचा खणीच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली ः सुशोभिकरण करत असताना काळया खणीचा इतिहासाचा फलक सांगलीतील आपटा पोलीस चौकी ते पुष्पराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दोनशे वर्ष जुन्या असलेल्या काळी खणीवर महापालिकेने लावला आहे. या फलकामुळे नागरिकांचे याकडे लक्ष वेधले जात आहे.आयुक्त नितीन कापडणीस यांनी या खणीच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. या फलकावर असा मजकूर लिहिला आहे, काळी खण ही दोनशे वर्षांपूर्वीचा पाण्याचा जुना स्त्रोत्र आहे. इसवी सन १७९९ च्या सुमाराला सांगली आणि मिरज संस्थांच्या दोन वाटण्या झाल्या. त्यावेळी सांगली हे थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडे आले. त्यांनी हे शहर संस्थानिक राजधानी करण्याचे निश्चित करून ते सुनियोजित पद्धतीने वसवण्याचे ठरवले.

राजधानीसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय इमारती, नागरिकासाठी घरे, गणेश दुर्ग, किल्ला नदीकाठावरील गणेश मंदिर ,यासाठी मोठ्या प्रमाणात दगडाचे आवश्यकता होती आणि हा दगडाचा पुरवठा सांगली गावाजवळच मिळेल का ? याचा शोध चिंतामणराव यांनी घेतला.

या वेळी सांगलीच्या पूर्व बाजूला असलेल्या सध्या काळी खण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागांमधील जमिनीच्या भूगर्भातील कठीण असा काळा दगड त्यांना आढळून आला. त्यामुळे नवीन राजधानीसाठी लागणाऱ्या बांधकामासाठी दगडाची गरज गावाजवळच पूर्ण झाल्याने त्यांनी याठिकाणी खण तयार केली. त्यातून मोठ्या प्रमाणात काळा दगड बाहेर काढण्यात आले. त्या दगडातून सांगली शहराच्या तत्कालीन अनेक इमारती घरे, उभी राहिली.मोठ्या संख्येने खाणकाम केल्याने या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला. त्यात पाणी साठल्याने याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. पुढे राजधानीसाठी लागणाऱ्या सर्व इमारतीची गरज पूर्ण झाल्यावर ही खण तशीच पडून राहिली. त्यामध्ये पावसाचे पाणी साठून राहिले, तसेच भुगर्भातूनही पाण्याचे झरे मिळत गेले. त्यामुळे या जागेला तळ्याचे स्वरूप आले. काळ्या दगडाची खण म्हणून ती काळी खण या नावाने ओळखली जाऊ लागली. आता सुशोभीकरणात याबाबतचा इतिहास सांगणारा फलक महानगरपालिकेने काळा खणीत लावला आहे. याकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.

गणेश मंदिर, गणेश दुर्गच्या तटबंदीसाठी याच खणीतून आणला दगड 

विशेष म्हणजे गणेश दुर्ग या मोठ्या भुईकोट किल्ल्याच्या दगडी तटबंदीसाठी त्यांनी याच काळया खणीच्या दगडाचा वापर केला. सांगलीतील गणेश मंदिरासाठी काही दगड जोतिबा डोंगरावरून मागवण्यात आले होते मात्र अन्य कामासाठी लागणारा दगड याच खणीतून आणला होता.

पद्मभूषण शहा यांनी काढलेले चित्र फलकावर पद्मभूषण डॉक्टर विजयकुमार शहा यांनी १९५८ मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना काळया खणीचे काढलेले चित्र या फलकावर लावले गेले आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाwater scarcityपाणी टंचाईSangliसांगली