शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मन में (नहीं) है विश्वास! - समाजभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:37 IST

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील मृत्यू अन् तो लपविण्यासाठी पोलिसांनी केलेले कृत्य यामुळे पोलीस दलाला तर काळिमा फासला गेला आहेच, शिवाय पोलिसांबद्दल जनतेत असलेल्या विश्वासालाही तडा गेला आहे.

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील मृत्यू अन् तो लपविण्यासाठी पोलिसांनी केलेले कृत्य यामुळे पोलीस दलाला तर काळिमा फासला गेला आहेच, शिवाय पोलिसांबद्दल जनतेत असलेल्या विश्वासालाही तडा गेला आहे. न्यायालय, पोलीस आणि दवाखाना कुणाच्याही मागे लागू नये असे म्हणतात, हे खरेच आहे. कारण पैसा आणि वेळ यामध्ये किती खर्च होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. तरीही सर्वसामान्यच काय श्रीमंतांनाही वेगवेगळ्या कारणांवरून या तिन्ही कार्यालयांची पायरी चढावीच लागते. न्यायालयांबद्दल विश्वास टिकून आहे. रुग्णालयात पैसा खर्च झाला तरी आजार बरा होऊन माणूस सुखरूप घरी परत आल्याचे समाधान मिळते. पोलिसांचे ब्रीदवाक्यच आहे की, ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’. या ब्रीदवाक्याला जागणारे पोलीस आणि अधिकारी आजही आहेत. परंतु, युवराज कामटेसारखे अधिकारी पोलीस दलासच खलनायकाच्या किंवा असुराच्या रूपात समाजासमोर आणतात. यामुळे या समाजात असलेला विश्वास आणि दबदबा घालविण्याचे काम करतात. याचा परिणाम संपूर्ण दलाला भोगावा लागतो. पोलीस दलाचेही नैतिक खच्चीकरण झाल्यासारखे होते.

सांगलीतील प्रकरणात आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांच्या विरोधात आवाज उठविणाºयांची, तक्रार करणाºयांची संख्याही वाढल्याचे दिसते. पोलिसांकडून या ना त्या कारणांनी दुखावलेली काही मंडळीही असतात. पोलिसांनी निष्कारण त्रास दिला किंवा आपल्याला अडकविले, अशी भावना झालेली (कदाचित ते खरेही असू शकते.) काही मंडळीही असतात. त्यांना त्यावेळी आवाज उठवायला संधी मिळालेली नसते, ते अशावेळी आपल्यावरील अन्यायाबद्दल आवाज उठवितात. गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे लोकही पोलिसांवरील राग काढण्यासाठी अशावेळी सरसावतात. कारण, त्यांनीही कधी ना कधी पोलिसांचा ‘प्रसाद’ घेतलेला असतो. त्यामुळे एकूण समाजातच पोलिसांविरोधात वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळते. सांगली प्रकरणानंतर ते दिसतेच आहे. अनिकेत कोथळेच्या बाबतीत बोलायचे झाले, तर पोलिसांनी थर्ड डिग्री देणे यात नवे काही नाही. गुन्हेगारांना बोलते करण्यासाठी अशा प्रकारच्या हत्याराचा वापर केला जातो. परंतु, या मारहाणीत थेट त्याचा मृत्यू होणे हे मान्य नाही.

सांगलीपाठोपाठ लातूर येथेही गुजरातमधील एका व्यापाºयाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. पोलीस कोठडीतील मृत्यूच्या घटनाही अपवादाने घडतात. एका अहवालानुसार, जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात महाराष्ट्रात पोलीस कोठडीत मरण पावलेल्यांची संख्या २२ होती. ती देशात सर्वाधिक होती. त्याखालोखाल गुजरातमध्ये पोलीस कोठडीत १२ जणांचा मृत्यू झाला होता. देशातील पोलीस कोठडीतील मृतांची संख्या १३३ होती. यावरून पोलीस कोठडीतील मृत्यू नवा नाही; पण हा मृत्यू लपविण्यासाठी जे काही झाले ते महाराष्ट्रातच काय देशात प्रथमच झाले असावे! या घटनेमुळे पोलिसांनी आरोपींना किंवा संशयितांना मारहाण करावी की नाही? थर्ड डिग्री वापरावी की नाही, यावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.

या घटनेमुळे पोलीसही आता सावध झाले आहेत. एखाद्या संशयिताला मारहाण करताना त्यांना दहावेळा विचार करावा लागत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तर अटक केलेल्या आरोपीकडून माहिती मिळविण्यासाठी मारहाण करू नका, वैज्ञानिक पद्धती वापरून त्यांना बोलते करा, असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना बजावले असल्याचे समजते. वैज्ञानिक पद्धतींमध्ये लाय डिटेक्टर चाचणी, पॉलिग्राफ, ब्रेन मॅपिंग चाचणी आणि नार्को टेस्ट यासारख्या हत्यारांचा समावेश होतो. पोलीस यातून बोध घेतील आणि संशयित गुन्हेगारांची तपासणी अशा पद्धतीने करतील. त्यामुळे कोठडीत मृत्यू होणार नाही, अशी आशा बाळगायला हरकत नाही. अनिकेत कोथळे प्रकरणाने एक झाले आहे की, पोलिसांवरील जनतेचा विश्वास जसा कमी झाला आहे, तसाच एखादी कारवाई आपल्या अंगलट येईल की काय, अशी एक अनामिक भीती पोलिसांमध्येही निर्माण झाली आहे. त्यांचाही विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळेच ‘मन में (नहीं) है विश्वास’ असे म्हणावेसे वाटते.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे