शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

मन में (नहीं) है विश्वास! - समाजभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:37 IST

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील मृत्यू अन् तो लपविण्यासाठी पोलिसांनी केलेले कृत्य यामुळे पोलीस दलाला तर काळिमा फासला गेला आहेच, शिवाय पोलिसांबद्दल जनतेत असलेल्या विश्वासालाही तडा गेला आहे.

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील मृत्यू अन् तो लपविण्यासाठी पोलिसांनी केलेले कृत्य यामुळे पोलीस दलाला तर काळिमा फासला गेला आहेच, शिवाय पोलिसांबद्दल जनतेत असलेल्या विश्वासालाही तडा गेला आहे. न्यायालय, पोलीस आणि दवाखाना कुणाच्याही मागे लागू नये असे म्हणतात, हे खरेच आहे. कारण पैसा आणि वेळ यामध्ये किती खर्च होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. तरीही सर्वसामान्यच काय श्रीमंतांनाही वेगवेगळ्या कारणांवरून या तिन्ही कार्यालयांची पायरी चढावीच लागते. न्यायालयांबद्दल विश्वास टिकून आहे. रुग्णालयात पैसा खर्च झाला तरी आजार बरा होऊन माणूस सुखरूप घरी परत आल्याचे समाधान मिळते. पोलिसांचे ब्रीदवाक्यच आहे की, ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’. या ब्रीदवाक्याला जागणारे पोलीस आणि अधिकारी आजही आहेत. परंतु, युवराज कामटेसारखे अधिकारी पोलीस दलासच खलनायकाच्या किंवा असुराच्या रूपात समाजासमोर आणतात. यामुळे या समाजात असलेला विश्वास आणि दबदबा घालविण्याचे काम करतात. याचा परिणाम संपूर्ण दलाला भोगावा लागतो. पोलीस दलाचेही नैतिक खच्चीकरण झाल्यासारखे होते.

सांगलीतील प्रकरणात आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांच्या विरोधात आवाज उठविणाºयांची, तक्रार करणाºयांची संख्याही वाढल्याचे दिसते. पोलिसांकडून या ना त्या कारणांनी दुखावलेली काही मंडळीही असतात. पोलिसांनी निष्कारण त्रास दिला किंवा आपल्याला अडकविले, अशी भावना झालेली (कदाचित ते खरेही असू शकते.) काही मंडळीही असतात. त्यांना त्यावेळी आवाज उठवायला संधी मिळालेली नसते, ते अशावेळी आपल्यावरील अन्यायाबद्दल आवाज उठवितात. गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे लोकही पोलिसांवरील राग काढण्यासाठी अशावेळी सरसावतात. कारण, त्यांनीही कधी ना कधी पोलिसांचा ‘प्रसाद’ घेतलेला असतो. त्यामुळे एकूण समाजातच पोलिसांविरोधात वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळते. सांगली प्रकरणानंतर ते दिसतेच आहे. अनिकेत कोथळेच्या बाबतीत बोलायचे झाले, तर पोलिसांनी थर्ड डिग्री देणे यात नवे काही नाही. गुन्हेगारांना बोलते करण्यासाठी अशा प्रकारच्या हत्याराचा वापर केला जातो. परंतु, या मारहाणीत थेट त्याचा मृत्यू होणे हे मान्य नाही.

सांगलीपाठोपाठ लातूर येथेही गुजरातमधील एका व्यापाºयाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. पोलीस कोठडीतील मृत्यूच्या घटनाही अपवादाने घडतात. एका अहवालानुसार, जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात महाराष्ट्रात पोलीस कोठडीत मरण पावलेल्यांची संख्या २२ होती. ती देशात सर्वाधिक होती. त्याखालोखाल गुजरातमध्ये पोलीस कोठडीत १२ जणांचा मृत्यू झाला होता. देशातील पोलीस कोठडीतील मृतांची संख्या १३३ होती. यावरून पोलीस कोठडीतील मृत्यू नवा नाही; पण हा मृत्यू लपविण्यासाठी जे काही झाले ते महाराष्ट्रातच काय देशात प्रथमच झाले असावे! या घटनेमुळे पोलिसांनी आरोपींना किंवा संशयितांना मारहाण करावी की नाही? थर्ड डिग्री वापरावी की नाही, यावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.

या घटनेमुळे पोलीसही आता सावध झाले आहेत. एखाद्या संशयिताला मारहाण करताना त्यांना दहावेळा विचार करावा लागत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तर अटक केलेल्या आरोपीकडून माहिती मिळविण्यासाठी मारहाण करू नका, वैज्ञानिक पद्धती वापरून त्यांना बोलते करा, असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना बजावले असल्याचे समजते. वैज्ञानिक पद्धतींमध्ये लाय डिटेक्टर चाचणी, पॉलिग्राफ, ब्रेन मॅपिंग चाचणी आणि नार्को टेस्ट यासारख्या हत्यारांचा समावेश होतो. पोलीस यातून बोध घेतील आणि संशयित गुन्हेगारांची तपासणी अशा पद्धतीने करतील. त्यामुळे कोठडीत मृत्यू होणार नाही, अशी आशा बाळगायला हरकत नाही. अनिकेत कोथळे प्रकरणाने एक झाले आहे की, पोलिसांवरील जनतेचा विश्वास जसा कमी झाला आहे, तसाच एखादी कारवाई आपल्या अंगलट येईल की काय, अशी एक अनामिक भीती पोलिसांमध्येही निर्माण झाली आहे. त्यांचाही विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळेच ‘मन में (नहीं) है विश्वास’ असे म्हणावेसे वाटते.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे