शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

अतिथीगृह, प्रसुतीगृहाचीही इमारत पाडणार

By admin | Updated: August 11, 2015 23:42 IST

महापालिकेचा निर्णय : २० आॅगस्टपासून सुरू होणार काम; प्रशासनाची मंजुरी

सांगली : बीओटी किंवा पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) अंतर्गत सांगलीतील महापालिकेच्या अतिथीगृहाची व प्रसुतीगृहाची इमारत विकसित करण्यात येणार आहे. तूर्त ही इमारत २0 आॅगस्टपासून पाडण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. प्रशासनानेही इमारत उतरविण्यासाठी हिरवा कंदील दर्शविल्याची माहिती महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सांगलीतील अतिथीगृहाच्या इमारतीच्या जागेत अलिशान व्यापारी संकुल उभारण्याचा विचार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. आता याला मूर्तस्वरुप प्राप्त होणार आहे. तत्कालीन नगरपालिकेच्या कालावधित ही इमारत बांधण्यात आली आहे. ही इमारत सध्या धोकादायकही बनली आहे. त्यामुळे ही इमारत बीओटी किंवा अन्य योजनेच्या माध्यमातून विकसित करण्याचा विचार महापालिकेत सुरू होता. महापौर कांबळे यांनी अतिथीगृहासह नजीकच असलेली प्रसुतीगृहाची इमारतही नव्याने बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रशासनानेही याबाबत हिरवा कंदील दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. २0 आॅगस्टपासून इमारत उतरविण्याचे काम सुरू होईल. महापौर म्हणाले की, खासगीकरणातून इमारती उभारताना रितसर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. महापालिकेला या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक फायदा होईल, तसेच या इमारतीसुद्धा चांगल्या पद्धतीने विकसित होतील, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी खासगीकरणातून झालेल्या त्रुटी सुधारून हा प्रकल्प राबविण्यात येईल. त्यासाठीची तयारी आता झालेली आहे. प्रसुतीगृह, जन्म-मृत्यू विभाग व अन्य कार्यालयांचे स्थलांतर महापालिकेच्या रिकाम्या इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी काही पर्यायही उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. दोन्ही इमारतींच्या जागेचा विचार केला, तर याठिकाणी दोन वेगवेगळी संकुले उभारण्यात येऊ शकतात. (प्रतिनिधी)धोरणात्मक निर्णयाची आवश्यकतामहापौरांचा हा प्रस्ताव महासभेत चर्चेला येणे आवश्यक आहे. येत्या महासभेत याविषयीची चर्चा होण्याची शक्यता आहे. महापौरांमार्फतच हा विषय महासभेपुढे चर्चेला येण्याची शक्यता आहे. धोरणात्मक निर्णयानंतरच निविदा प्रक्रियेला सुरुवात करता येणार असल्याने, अजून यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो.इमारतीला झाली चाळीस वर्षेअतिथीगृहाची इमारत तत्कालीन नगरपालिकेच्या कालावधित १४ एप्रिल १९७४ रोजी उभारण्यात आली आहे. चाळीस वर्षांपूर्वीची ही इमारत असून वरच्या मजल्यांवरील बांधकाम खचले आहे. काळवंडलेल्या या इमारतीला केवळ रंगरंगोटीशिवाय काहीही केलेले नाही. त्यामुळे वारंवार किरकोळ पडझड होतच आहे. या इमारतीमध्ये पूर्वी सहा विभागांचे कामकाज सुरू होते. आता जन्म-मृत्यू, मालमत्ता विभाग आहे. हे दोन्ही विभाग स्थलांतरित करण्यात येणार आहेत.