शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आरेवाडीच्या कार्यक्रमावरुन घोरपडे गटात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST

कवठेमहांकाळ : आरेवाडी ता. कवठेमहाकाळ येथील बनात बिरोबाच्या साक्षीनं टेंभू योजनेचा कार्यक्रम पार पडला. मात्र महाआघाडीचे घटक पक्ष ...

कवठेमहांकाळ : आरेवाडी ता. कवठेमहाकाळ येथील बनात बिरोबाच्या साक्षीनं टेंभू योजनेचा कार्यक्रम पार पडला. मात्र महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना नेते, टेंभू आणि म्हैशाळ योजनेसाठी अफाट प्रयत्न करणारे माजीमंत्री अजितराव घोरपडे यांना साधे कार्यक्रमाचे निमंत्रण ही दिले नाही. त्यामुळे घोरपडे गटात नाराजीचे सूर उमटले आहेत.

राज्यातील महाआघाडी बनवताना घेतलेल्या आणा-भाकाना मात्र तिलांजली देण्यात आली. त्यामुळे राज्यात असणारी कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीची महाआघाडी ,तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात मात्र एकमेकांच्या विरोधात उभी टाकली आहे. पाणी आणि अजितराव घोरपडे हे समीकरण राज्यात सर्वश्रुत आहे. युतीचे शासन असताना अजितराव घोरपडे यांनी दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. युती शासनाच्या काळात घोरपडे यांनी म्हैसाळ आणि टेंभू योजनांची कुदळ मारुन योजनेचे पाणी शेतकऱ्याच्या शिवारात फिरवले.

मिरज तालुक्यातील डोंगरवाडी योजना ही अजितराव घोरपडे यांच्या हट्टापायी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी निधी देऊन पूर्णत्वाकडे नेली. हे कळंबी येथील एका कार्यक्रमात जयंत पाटील यांनीच आर. आर. पाटील यांच्या साक्षीने बोलून दाखवले, असे घोरपडे गोटात चर्चेचे सूर उमटले आहेत. राष्ट्रवादीने टेंभूचे पाणी पूजन घेतले. परंतु ज्या योजनेसाठी आणि तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी घोरपडे यांचे मोठे योगदान आहे. शिवाय ते सद्या महाआघाडी सरकारमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रमुख नेते आहेत. किमान त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आवश्यक होते, असे तालुक्यातील घोरपडे गटाचे कार्यकर्ते बोलत आहेत.

राज्यात महाआघाडी सुखाने नांदत आहे. मात्र कवठेमहांकाळमध्ये या महाआघाडीत बेबनाव अविश्वासाचे व असहकार्यांचे वातावरण आहे. टेंभू आणि म्हैसाळ योजनेचा कार्यक्रम बिरोबाच्या बनात जयंत पाटील, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या साक्षीने पार पडला. या कार्यक्रमाचे निमंत्रक ह्या तासगाव कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील आणि त्यांची राष्ट्रवादीची टीम होती.

सिंचन योजनांसाठी योगदान असणारे अजितराव घोरपडे या प्रमुख नेत्यास कार्यक्रमास डावलून राष्ट्रवादीने काय साध्य केले, अशीही चर्चा रंगली आहे. विकासाच्या राजकारणावर तरी राजकारण विसरून या नेतेमंडळींनी एकत्र येणे गरजेचे होते. ज्या आर आर पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांना एकवेळ सोबत घेतले होते. किमान त्या धोरणात्मक राजकारणाचा आदर्श तरी या कार्यक्रमात घोरपडे यांना बोलावुन तालुक्याला दाखवायचा होता, असे जनतेतून बोलले जात आहे.