शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गझलकार इलाही जमादार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मराठी गझलविश्वाला आपल्या अनोख्या शैलीने साज चढवित साहित्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मराठी गझलविश्वाला आपल्या अनोख्या शैलीने साज चढवित साहित्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही युसूफ जमादार (वय ७५) यांचे दुधगाव (ता. मिरज, जि. सांगली) येथे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर आज सोमवारी, दिनांक १ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इलाही यांच्या निधनाने मराठी गझलविश्वातला कोहिनूर हरपल्याची भावना साहित्यविश्वातून व्यक्त होत आहे.

इलाही जमादार यांचा जन्म दुधगाव येथे १ मार्च १९४६ रोजी झाला. गझलकार सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलविश्वात सर्वाधिक लोकप्रियता मिळविणारे गझलकार म्हणून त्यांना ओळखले जात होते. बरीच वर्षे पुण्यात एका आऊटहाऊसच्या छोट्या खोलीत त्यांनी वास्तव्य केले. दोन महिन्यांपूर्वी तोल जाऊन पडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते दुधगाव येथे त्यांच्या मूळ गावी परतले. नातेवाईकांनी त्यांची सुश्रूषा केली. शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

इलाही जमादार यांनी १९६४ पासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या. 'जखमा अशा सुगंधी', 'दोहे इलाहीचे', 'भावनांची वादळे', 'गुफ्तगू' 'सखये' 'अनुराग', 'अनुष्का', 'अभिसारिका', 'माझे मौन' 'मला उमगलेली मीरा' अशा सुमारे २० हून अधिक पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. यातील 'जखमा अशा सुगंधी', 'दोहे इलाहीचे' आणि 'भावनांची वादळे' या पुस्तकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. उर्दू व अन्य भाषांमधून अनेक गझलप्रकार त्यांनी मराठीत आणले. काही नव्या गझलप्रकारांची निर्मितीही त्यांनी केली. मराठीसह हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी गीते लिहिली. त्यांच्या गीतांवर आधारित हिंदी व मराठीत सांगीतिक कार्यक्रम व नृत्यनाटिका आजही सादर केल्या जातात.

महाराष्ट्रातील अनेक शहरांत तसेच महाराष्ट्राबाहेरही 'जखमा अशा सुगंधी' व 'महफिल - ए - इलाही' या नावाने मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम त्यांनी सादर केले. अनेक कविसंमेलने व मुशायरे यात सहभाग घेतला होता.

चौकट

'त्या' भेटीचा योग आलाच नाही

दिवंगत प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी इलाही जमादार यांच्या गझलांवर आधारित 'निशिगंध' या अल्बममधून प्रथमच मराठीत गाणी गायिली होती. या अल्बमचे निर्माते शांतिवन तोडकर व संगीतकार हर्षित अभिराज यांच्यासमोर एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी इलाही जमादारांच्या लेखनाचे कौतुक करून त्यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती, पण या दोन दिग्गजांच्या भेटीचा योग कधीच जुळला नाही.