शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

Maharashtra Assembly Election 2019 : रणधुमाळीत पूरग्रस्तांचे प्रश्न अधांतरीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:02 PM

विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असताना महापुराच्या संकटाचा सामना करावा लागलेल्या जनतेला कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरणधुमाळीत पूरग्रस्तांचे प्रश्न अधांतरीच!विधानसभा निवडणुकीचा बार

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असताना महापुराच्या संकटाचा सामना करावा लागलेल्या जनतेला कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे.

प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाले, छोटे व्यापारी-व्यावसायिकांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश शासनाने सोमवारी काढले. मात्र प्रत्यक्षात व्यापाऱ्यांना रक्कम मिळालेली नाही. व्यापाऱ्यांच्या अडचणी कायम आहेत. इतरही घटकाला मिळालेली मदत अत्यल्प स्वरूपातील आहे. निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून पूरग्रस्तांच्या प्रश्नांना बगल देण्यात येत आहे.महापुराचा कटू अनुभव पाठीशी घेऊन व कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसूनही पुराचा फटका बसलेल्या भागातील नागरिक पुन्हा नव्याने उभारी घेत आहेत. अशा परिस्थितीतच विधानसभा निवडणुकीचा बार उडाल्याने पूरग्रस्तांच्या प्रश्नावर निवडणुका गाजतील असे चित्र असताना, सर्वच राजकीय पक्षांकडून स्थानिक प्रश्नांना बगल देण्यात येत आहे.निवडणुकीमध्ये मदतीसाठी सर्वात प्रथम कोण पोहोचले व काय मदत केली, यावरच चर्चा होताना दिसत आहे. मात्र, पूरग्रस्तांचे मूळ दुखणे असलेल्या भरपाईची रक्कम, अनुदान अद्याप पोहोचलेले नाही.पूरस्थिती आटोक्यात आल्यानंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण केले व नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनास सादर केला. पूरग्रस्तांना देण्यात येणारा दैनंदिन भत्ता व सानुग्रह अनुदानाच्या वाटपात प्रशासनाने चांगली कामगिरी केली असली तरी, त्यानंतरच्या घटकांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

पुरामुळे व्यापाऱ्यांचे ७० ते ८० कोटी रूपयांचे नुकसान झाले. भरपाई देण्याचे आदेश शासनाने सोमवारी काढल्याचे सांगण्यात आले. पूरग्रस्तांच्या सानुग्रह अनुदानातील एक हप्ता थेट बॅँक खात्यात जमा होणार होता.

बॅँकांच्या तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ताही जमा न झाल्याचे चित्र आहे. शेतीच्या नुकसानीचेही पंचनामे पूर्ण झाले असून, अहवाल सादर असला तरी भरपाईबाबत कार्यवाही नाही. सध्या आचारसंहिता लागू असल्यानेही निर्णयात अडचणी येत आहेत.

टॅग्स :sangli-acसांगलीfloodपूरvidhan sabhaविधानसभा