शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या अंदाजपत्रकात १०० कोटींच्या तुटीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापुरानंतर आलेले कोरोनाचे संकट, हिरावलेल्या नोकऱ्या, सर्वसामान्य नागरिकांचे कोलमडलेले आर्थिक गणित याचा परिणाम यंदा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापुरानंतर आलेले कोरोनाचे संकट, हिरावलेल्या नोकऱ्या, सर्वसामान्य नागरिकांचे कोलमडलेले आर्थिक गणित याचा परिणाम यंदा महापालिकेच्या अंदाजपत्रकावरही होणार आहे. कोरोनामुळे घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्तासह विविध करांची वसुली पूर्णत: ठप्प होती. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नियोजनच संकटात सापडले आहे. यंदा अंदाजपत्रकात १०० कोटींची तूट येण्याची भीती आहे. ही तूट पुढील वर्षी कशी भरून काढणार, याची चिंता प्रशासनाला लागली आहे.

महापालिका प्रशासनाकडून सध्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ घालून नव्या योजनांना निधीची तरतूद करण्याची कसरत अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. त्यातच गेल्या दोन वर्षांत महापालिकेवर नैसर्गिक आपत्तीचे संकट होते. २०१९ मध्ये महापूर व मार्च २०२० पासून कोरोनामुळे महापालिकेचे संपूर्ण कामकाजच थांबले होते. महापुरापेक्षा कोरोनाचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. सात ते आठ महिने हाताला काम नव्हते. व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे.

सध्या महापालिकेचा गाडा शासनाच्या अनुदानावरच सुरू आहे. जकात, उपकरापोटी दरमहा १२ कोटींच्या आसपास अनुदान येते. यातून कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, दैनंदिन खर्च भागविला जातो. घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता करासह इतर करांची वसुलीच बंद होती. आता कुठे घरपट्टी, पाणीपट्टीची बिले वितरित करण्यात आली आहेत. घरपट्टीतही उपयोगकर्ता कर लागू केल्याने तो भरण्यास नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. घरपट्टीची थकबाकी सुमारे ७५ कोटीच्या घरात आहे. त्यापैकी २० कोटींच्या आसपास वसुली होईल अशी स्थिती आहे. पाणीपट्टी विभागाची अवस्था वेगळी नाही. नऊ महिन्यांचे एकत्रित बिल दिल्याने नागरिकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. मागील थकबाकी व चालू कर असे जवळपास ३० कोटी रुपयांचे उत्पन्न पाणीपट्टीतून अपेक्षित होते. पण आतापर्यंत केवळ ४ कोटीच वसूल झाले आहेत. मालमत्ता विभागाकडे ७ कोटींची थकबाकी आहे. मार्चपर्यंत कोटी-सव्वा कोटी वसूल होतील. नगररचना विभागाच्या १५ ते २० कोटींपैकी आठ ते दहा कोटींच्या वसुलीचा अंदाज आहे.

कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थचक्रालाच ब्रेक लागला आहे. त्यामुळे यंदा जवळपास १०० कोटी रुपयांची तूट येऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. ही तूट पुढील वर्षी भरून काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

चौकट

विकासकामांवर परिणाम

कोरोनामुळे आयुक्तांनी आरोग्य वगळता इतर सर्व कामांना ब्रेक लावला होता. रस्ते, गटारीसह वाॅर्डातील किरकोळ कामेही बंद होती. आता वर्कऑर्डर झालेली कामे सुरू झाली आहेत. पण मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या फायली अजूनही धूळ खात पडल्या आहेत. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेत्यांच्या निधीलाही आयुक्तांनी कात्री लावली आहे. त्यात यंदा मार्चपर्यंत अपेक्षित करवसुली न झाल्यास पुढील वर्षीही विकासकामांवर परिणाम होणार आहे.