शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा सांगलीत मोर्चा, कर्ज वसुली थांबविण्याची मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: February 29, 2024 18:41 IST

'सरकारला निवडणुकीत हिसका दाखवा'

सांगली : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांना हमीभाव मिळत नसल्याने पुन्हा कर्जबाजारी बनला आहे. दुष्काळी उपाययोजना राबवल्या जात असताना कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी, तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढला. शासनाच्याविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. शेतमालाला आधारभूत किंमत नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची गरज आहे. शासनाने जिल्हा टंचाईसदृश्य जाहीर केला असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, बँका पतसंस्थांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली होत आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. बेकायदेशीर कर्जवसुली तत्काळ थांबवण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली.

गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये अफू लागवडीला परवानगी आहे, त्या धर्तीवर राज्यात अफू शेतीचा परवाना देण्यात यावा, अशी मागणी मागणी आहे. शेतकऱ्याला विमा कंपनी निवडण्याचा पर्याय देण्यात यावा, सरकारने विमा कंपन्या निश्चित करू नयेत. शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देणी द्यावीत, बंद पडलेले ऊस कारखाने पुन्हा सुरू करावेत. दोन ऊस कारखान्यांमधील हवाई अंतराची बंधने काढून टाका. जीएम बियाण्यांच्या वापरावर लादलेले निर्बंध उठवावेत. वन्यप्राणी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजनांसाठी समिती स्थापन करण्यात यावी. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या बेदखल ठरवत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याची किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशारा रघुनाथदादांनी दिला.यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य महादेव कोरे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, शिवाजी पाटील, आमगोंडा पाटील, धनपाल माळी, धनंजय कदम, प्रदीप जाधव, लक्ष्मण पाटील, शंकर मोहिते, राजगोंडा बिरनाळे, माणिक पाटील, वंदना माळी उपस्थित होते.सरकारला निवडणुकीत हिसका दाखवा : रघुनाथदादा पाटीलशेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने पुन्हा कर्जाच्या खाईत शेतकरी अडकत चालला आहे. या सरकारकडून काही अपेक्षा पूर्ण होतील, असे दिसत नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत हिसका दाखवा, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीagitationआंदोलन