शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चे रविवारपासून शेतकरी जागृती अभियान

By admin | Updated: December 15, 2015 00:42 IST

वासुंबेतून सुरुवात : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार--लोकमतचा प्रभाव

तासगाव : तासगाव तालुक्यात यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी रविवारपासून (ता. २०) गावा-गावात अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात वासुंबे गावातून होणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदतीसाठी संघटना पुढाकार घेणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.तालुक्यात विदर्भाप्रमाणे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शासनाचे चुकीचे धोरण हेच यामागचे मुख्य कारण आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी, कर्ज वसुलीचा तगादा मागे लावणाऱ्यांचीच हत्या करावी. कोणाकडून कर्ज वसुलीचा तगादा लावला जात असल्यास यापुढे स्वाभिमानी संघटनेशी संपर्क साधावा. संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. कर्जबाजारीपणामुळे यापुढे तालुक्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, यासाठी स्वाभिमानी संघटना २० तारखेपासून गावा-गावात जनजागृती अभियान राबविणार आहे. याच अभियानांतर्गत लोकांकडून आर्थिक मदत गोळा करुन, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहितीही खराडे यांनी दिली.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांच्या बाबतीतले जाचक निकष बदलावेत, यासह अन्य मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी खराडे यांनी दिला. शेतकऱ्यांच्यामदतीसाठी स्वाभिमानी संघटनेकडून हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. अडचणीत किंवा नैराश्येत असलेल्या शेतकऱ्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधल्यास, संघटनेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक खाडे, सनत पाटील, गुलाबराव यादव, शरद शेळके, अर्जुन थोरात, सचिन पाटील, विशाल शिंंदे उपस्थित होते. (वार्ताहर)‘लोकमत’च्या बातमीने संघटना सरसावल्या ‘लोकमत’मधून तासगाव तालुक्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत तीन दिवस प्रकाशझोत टाकण्यात आला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे भीषण वास्तव मांडण्यात आले होते. या बातम्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनाही शेतकऱ्यांसाठी सरसावल्या आहेत. तालुक्याचे राजकीय नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे मात्र अद्यापही या घटनेकडे दुर्लक्ष आहे.