शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळातही १८,५८५ पॉझिटिव्ह, पंधरा दिवसांनंतरही रुग्ण कमी होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संचारबंदीच्या काळात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून या पंधरा दिवसांत जिल्ह्यात तब्बल १८ हजार ५८५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : संचारबंदीच्या काळात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून या पंधरा दिवसांत जिल्ह्यात तब्बल १८ हजार ५८५ लोक पॉझिटिव्ह आले आहेत. संचारबंदीतही नागरिकांचा सुरू असलेला मुक्तसंचार या गोष्टीस कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य शासनाने पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर केली होती. या काळात लोकांच्या संचाराला आळा बसून संसर्ग कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, चित्र उलटेच झाले आहे. संचारबंदीच्या काळापूर्वी असलेल्या आकडेवारीपेक्षा संचारबंदीतील कोरोनाची आकडेवारी अधिक चिंताजनक आहे. या काळात पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर अधिक दिसून येत आहे. त्यामुळे संचारबंदीचे काय फलित मिळाले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. संचारबंदीचा हा काळ मोठा होता. आता पुन्हा आठवडाभराचा लॉकडाऊन सुरू झाला असल्याने या काळात तरी गर्दी नियंत्रणात राहणार का, अशी शंका उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात सध्या उपलब्ध बेडची संख्या जवळपास संपुष्टात आली आहे. बेड मिळविण्यासाठी लोकांची कसरत सुरू आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर व लसीची टंचाई आहे. अशा काळात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे, मात्र, लोकांच्या बेशिस्तपणामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत आहे.

चौकट

ग्राफसाठी

३१ मार्च ते १४ एप्रिल टेस्टिंग ४३५९३

पॉझिटिव्ह ६,२७९

रुग्णालयातून सुटी २,९५२

या काळातील पॉझिटिव्हीटी रेट १४.४० टक्के

कोरोनामुक्ती दर ५० टक्के

चौकट

१५ एप्रिल ते १ मे टेस्टिंग ८१,५५७

पॉझिटिव्ह १८,०८२

कोरोनामुक्त १०,३००

या काळात पॉझिटिव्हीटी रेट २२.१७ टक्के

कोरोनामुक्तीचा दर ५५.४२ टक्के

चौकट

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात नागरिकांचा रस्त्यावर मुक्तसंचार सुरू होता. किराणा माल, भाजीपाला खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी शहरात होती.

बससेवा सुरू असल्याने जिल्ह्याबाहेरील लोक विनातपासणी शहरात, गावांत येत होते. त्यांची तपासणी न झाल्याने त्यांच्यामुळेही संसर्ग वाढला.

लसीकरण केंद्रांवरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. तसेच त्याठिकाणी कोविड चाचणीही सुरू राहिल्याने कोरोनाला निमंत्रण मिळाले.

चौकट

यामुळे वाढले ग्रामीण भागात रुग्ण

ग्रामीण भागातही परजिल्ह्यातून येणाऱ्या लाेकांची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गावागावांमध्ये रुग्णसंख्या वाढत गेली.

संचारबंदीपूर्वी अनिर्बंध विवाहसोहळे, त्याठिकाणची गर्दी, स्मशानभूमीत होणारी गर्दी संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरली.