शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:44 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ...

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केेला.

महापालिकेने सांगली, मिरज, कुपवाड शहरांत बुधवारपासून जनता कर्फ्यू जाहीर केलेला असतानाच पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदीची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त सर्व व्यवहार शंभर टक्के बंद राहणार आहेत.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सोमवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५६८ वर पोहोचली आहे. ४० रुग्णांचा मृत्यूही झाला. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आठ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. प्रशासनाशी चर्चेनंतर बुधवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल.

पाटील म्हणाले की, जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा अगदीच काठावर होत आहे. तो मिळविण्यासाठी प्रचंड ताकद लागत आहे. औषधांबाबतही समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे ठरले आहे. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच नागरिकांनी लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

दरम्यान, पालकमंत्री १ मेपासून विविध तालुक्यांना भेटी देऊन कोरोनास्थितीचा आढावा घेत आहेत. रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींचा आढावा घेत आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य काही भागात परिस्थिती भयावह आहे. तेथे कोरोना नियंत्रणासाठी कार्यवाहीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

चौकट

केवळ वैद्यकीय सेवा सुरू

जिल्ह्यात काही गावांनी सोमवारपासूनच गावपातळीवर जनता कर्फ्यू लागू केला आहे. काही ठिकाणी आठवडाभरासाठी तर काही ठिकाणी पंधरवड्यासाठी व्यवहार बंद ठेवले आहेत. ही गावेदेखील आता आपोआपच जिल्हास्तरीय लॉकडाऊनमध्ये समाविष्ट झाली आहेत. या काळात फक्त वैद्यकीय सेवा व तिच्याशी निगडित व्यवहार सुरु राहतील. सध्याची सकाळी ७ ते ११ या वेळेची सवलत लागू नसेल.