शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्जदार हिताय’मुळे जिल्हा बँक आली गोत्यात

By admin | Updated: September 4, 2015 22:25 IST

राजकारण भोवले : जत कारखान्यालाही मुक्तहस्ते कर्ज वाटप--जिल्हा बँक गैरव्यवहार-६

सांगली : जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांनी सहकारी साखर कारखानदारीवर प्रचंड कृपादृष्टी दाखविली. कर्जवाटप करताना त्यांनी प्रशासकीय टिपणी, नियम, कर्जदाराची आर्थिक स्थिती याचा कोणताही विचार केला नाही. राज्य सहकारी बँकेला तारण असलेल्या जत येथील राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यात आला. आता कारखान्याच्या ५ कोटी ८६ लाखाच्या थकबाकीला कोणतेही तारण उरलेले नाही. सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीत तत्कालीन संचालकांनी मुक्तहस्ते कर्जवाटप केले. कार्यालयीन मंजुरी नसताना, तारण मालमत्ता राज्य शासनाकडे असताना आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही अशा कारखान्यांना कर्जवाटप करण्याचे धाडस माजी संचालकांनी केले. जत येथील साखर कारखान्याच्याबाबतीत अशीच चूक करण्यात आली. या कारखान्याला राज्य सहकारी बँकेनेही कर्जपुरवठा केला होता. त्यामुळे थकित कर्जासाठी राज्य बँकेने संपूर्ण कारखान्याची मालमत्ता ४७ कोटी ८६ लाखांना विकली. जिल्हा बँकेला त्यांच्या कर्ज थकबाकीपोटी केवळ १ कोटी २२ लाख रुपये प्राप्त झाले. उर्वरित १ कोटी ४९ लाखाला आता कोणतेही तारण उरलेले नाही. या कारखान्यास १९ जुलै १९९९ रोजी २ कोटी, ९ सप्टेंबर २00२ रोजी ५0 लाख, २३ नोव्हेंबर २00२ रोजी १ कोटी ५0 लाख मंजूर करून ते वितरित केले. वास्तविक या कारखान्याला कर्जपुरवठा करणाऱ्या राज्य बँकेची परवानगी जिल्हा बँकेने घेणे गरजेचे होते. अशी परवानगी न घेताच संचालक मंडळाने स्वत:च्या जबाबदारीवर कर्जवाटप केले. कर्जास कार्यालयाचीही शिफारस नव्हती. त्यामुळे ४ कोटी ३७ लाखाचे नुकसान जिल्हा बँकेला झाले. एकूण ५ कोटी ८६ लाख रुपयांच्या नुकसानीपोटी जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांना आता जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. विनातारण व कार्यालयाची शिफारस विचारात न घेता नियमांचे बंधन न पाळता साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करण्यात आला. त्यामुळे संचालकांची ही ‘कर्जदार हिताय’ कृती संचालकांच्याच अंगलट आली आहे. याशिवाय बँकेचेही अशा निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात जतच्या कारखान्याचे हे प्रकरणही तितकेच गंभीर आहे. चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी संबंधितांवर ठपका ठेवला आहे. (प्रतिनिधी)यांना ठरविले जबाबदार आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, विलासराव शिंदे, मोहनराव कदम, प्रा. सिकंदर जमादार, मदन पाटील, विजय सगरे, जगन्नाथ म्हस्के, दिनकर पाटील, अमरसिंह नाईक, शिवराम यादव, बी. के. पाटील, महावीर कागवाडे, मंगल शिंदे, मीनाक्षी शिंदे, अनिता वग्याणी आदींना जबाबदार धरण्यात आले आहे.