शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची २५ टक्के नुकसानभरपाई आगाऊ देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST

सांगली : महापूर काळातील सोयाबीनच्या नुकसानीपोटी विम्याची २५ टक्के भरपाई आगाऊ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तशी अधिसूचना जिल्हाधिकारी ...

सांगली : महापूर काळातील सोयाबीनच्या नुकसानीपोटी विम्याची २५ टक्के भरपाई आगाऊ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तशी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जारी केली. एकूण पाच महसूल मंडलांतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.

भिलवडी व अंकलखोप (ता. पलूस), सांगली, कसबे डिग्रज, कवठेपिरान (ता. मिरज) या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या विमा हप्त्याची रक्कम २३ जुलैअखेर किंवा त्यापूर्वी भरली असणे अपेक्षित आहे. त्यांच्या सोयाबीन पिकाच्या अपेक्षित नुकसानभरपाईच्या २५ टक्क्यांपर्यंत नुकसानभरपाई आगाऊ देण्यात येईल. ही मदत अंतिम भरपाईच्या रकमेतून वळती केली जाणार आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ६८ पैकी १७ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाले. चरण, कोकरूड, सांगाव, मांगले (ता. शिराळा), वाळवा, बहे, ताकारी, तांदूळवाडी, चिकुर्डे (ता. वाळवा), कसबे डिग्रज, कवठेपिरान, सांगली, मिरज (ता. मिरज) व अंकलखोप, भिलवडी, कुंडल, पलूस (ता. पलूस) येथेही सोयाबीनची हानी झाली. त्याची उत्पादकता ५० टक्क्यांपेक्षा कमी अपेक्षित असणारी गावे अशी : पलूस तालुका - भिलवडी - ३५ टक्के, अंकलखोप २७ टक्के. मिरज तालुका - सांगली - ६ टक्के, कसबे डिग्रज व कवठेपिरान ३९. यातील भिलवडी, अंकलखोप, सांगली, कसबे डिग्रज व कवठेपिरान मंडलातील शेतकऱ्यांना आगाऊ भरपाई मिळेल.