शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
3
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
4
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
5
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
6
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
7
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
8
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
9
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
10
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
12
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
14
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
15
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
16
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
17
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
18
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
19
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
20
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे

By admin | Updated: November 26, 2014 00:07 IST

मिरजेत आदेश : पंचनाम्यानंतरच नुकसानीचा निर्णय

मिरज : मिरज तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष व फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार किशोर घाडगे यांनी आज (सोमवारी) पंचायत समितीत आयोजित बैठकीत दिले. पंचनाम्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर नुकसानीचा निर्णय शासनस्तरावर होणार आहे.
जिल्ह्यात ११ ते १६ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम द्राक्ष व फळबागांवर झाला आहे. नुकसानग्रस्त फळबागांचे व द्राक्षबागांचे पंचनामे करून नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी आहे. शासनाने बागायती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागा व फळबागांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार घाडगे यांनी मिरज पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांची बैठक घेतली. बैठकीत प्रत्येक गावनिहाय पंचनाम्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक या तिघांवर सोपविण्यात आली. मिरज तालुक्यात म्हैसाळ योजनेमुळे द्राक्ष व फळबागांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने छाटणी होऊन फुले आली होती. अशा नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे या तिघांकडून पंचनामे होणार आहेत. पंचनाम्याचे ५० टक्के व त्याहून अधिक नुकसान असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून प्राप्त होणारा अहवाल शासनाकडे सादर होणार आहे. याचा निर्णय शासनस्तरावर होणार असल्याचे तहसीलदार घाडगे यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने मिरज तालुक्यातील द्राक्षबागांवर रोगराईचा दुष्परिणाम झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने नुकसानग्रस्त द्राक्ष व फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)