शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अटल भुजल योजनेच्या माध्यमातून जल चळवळ उभी करा : कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 13:34 IST

water scarcity Sangli-जलदिन दिनांक 22 मार्च रोजी साजरा केला जातो . सन 2021 च्या जलदिनानिमित्त दि. 22 ते 27 मार्च जलसप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. याचे औचित्य साधून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दि. 23 मार्च 2021 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन सभेच्या माध्यमातून सांगलीच्या जनतेस जल चळवळ उभी करावी, असे आवाहन केले.

ठळक मुद्दे अटल भुजल योजनेच्या माध्यमातून जल चळवळ उभी करा : कलशेट्टीचार तालुक्यातील एकूण 92 गावांमध्ये जल चळवळ

सांगली : जलदिन दिनांक 22 मार्च रोजी साजरा केला जातो . सन 2021 च्या जलदिनानिमित्त दि. 22 ते 27 मार्च जलसप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. याचे औचित्य साधून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दि. 23 मार्च 2021 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन सभेच्या माध्यमातून सांगलीच्या जनतेस जल चळवळ उभी करावी, असे आवाहन केले.अटल भुजल योजना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि तासगाव या चार तालुक्यातील एकूण 92 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या कार्यशाळेस संबंधित तालुक्यातील तहसिलदार व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

या जल चळवळीस लोकसहभागाची जोड देवून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करू, असे तहसिलदार खानापूर यांनी यावेळी आश्वासित केले. गट विकास अधिकारी कवठेमहांकाळ, जत तसेच तासगाव यांनी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून योजना प्रभावीपणे राबवू असे सांगितले.तसेच जागतिक जल दिन 22 मार्च, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली कार्यालयात जल प्रतिज्ञा घेऊन साजरा करण्यात आला. निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेत असताना जलदिनानिमित्त जनजागृती हेतू ठेवून निरीक्षण विहिरींची माहिती संबंधित गावातील गावकऱ्यांना देण्यात आली, यामध्ये भूजल पातळी कशी मोजली जाते याची ग्रामस्थांना माहिती दिली.

याचबरोबर सांगली आकाशवाणी केंद्राला, वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. एस. गोसकी यांनी मुलाखतीद्वारे जनजागृती केली. यामध्ये अटल भुजल योजनेच्या अनुषंगाने ही माहिती प्रसारित करण्यात आली. दैनंदिन वापरामध्ये पाण्याची होऊ शकणारी बचत यावर चर्चा झाली. पाण्याचे प्रदूषण थांबवून पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी शासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना जनतेचा प्रतिसाद अत्यावश्यक असल्याने, जनतेच्या सक्रीय सहभागासाठी आवाहन करण्यात आले.सध्या कोवडि-19 च्या पार्श्वभूमीवर व्हाट्सअप ग्रुप द्वारे सुरू असणाऱ्या शाळांच्या ग्रुपवर पाण्याचे महत्त्व सांगणारे व्हिडिओ पाठवण्यात आले. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी व्हाट्सअप स्टेटसला पाण्याचे महत्व सांगणारे चित्रे, व्हिडिओ लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगली