शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

अटल भुजल योजनेच्या माध्यमातून जल चळवळ उभी करा : कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 13:34 IST

water scarcity Sangli-जलदिन दिनांक 22 मार्च रोजी साजरा केला जातो . सन 2021 च्या जलदिनानिमित्त दि. 22 ते 27 मार्च जलसप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. याचे औचित्य साधून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दि. 23 मार्च 2021 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन सभेच्या माध्यमातून सांगलीच्या जनतेस जल चळवळ उभी करावी, असे आवाहन केले.

ठळक मुद्दे अटल भुजल योजनेच्या माध्यमातून जल चळवळ उभी करा : कलशेट्टीचार तालुक्यातील एकूण 92 गावांमध्ये जल चळवळ

सांगली : जलदिन दिनांक 22 मार्च रोजी साजरा केला जातो . सन 2021 च्या जलदिनानिमित्त दि. 22 ते 27 मार्च जलसप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. याचे औचित्य साधून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दि. 23 मार्च 2021 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन सभेच्या माध्यमातून सांगलीच्या जनतेस जल चळवळ उभी करावी, असे आवाहन केले.अटल भुजल योजना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि तासगाव या चार तालुक्यातील एकूण 92 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या कार्यशाळेस संबंधित तालुक्यातील तहसिलदार व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

या जल चळवळीस लोकसहभागाची जोड देवून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करू, असे तहसिलदार खानापूर यांनी यावेळी आश्वासित केले. गट विकास अधिकारी कवठेमहांकाळ, जत तसेच तासगाव यांनी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून योजना प्रभावीपणे राबवू असे सांगितले.तसेच जागतिक जल दिन 22 मार्च, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली कार्यालयात जल प्रतिज्ञा घेऊन साजरा करण्यात आला. निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेत असताना जलदिनानिमित्त जनजागृती हेतू ठेवून निरीक्षण विहिरींची माहिती संबंधित गावातील गावकऱ्यांना देण्यात आली, यामध्ये भूजल पातळी कशी मोजली जाते याची ग्रामस्थांना माहिती दिली.

याचबरोबर सांगली आकाशवाणी केंद्राला, वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. एस. गोसकी यांनी मुलाखतीद्वारे जनजागृती केली. यामध्ये अटल भुजल योजनेच्या अनुषंगाने ही माहिती प्रसारित करण्यात आली. दैनंदिन वापरामध्ये पाण्याची होऊ शकणारी बचत यावर चर्चा झाली. पाण्याचे प्रदूषण थांबवून पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी शासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना जनतेचा प्रतिसाद अत्यावश्यक असल्याने, जनतेच्या सक्रीय सहभागासाठी आवाहन करण्यात आले.सध्या कोवडि-19 च्या पार्श्वभूमीवर व्हाट्सअप ग्रुप द्वारे सुरू असणाऱ्या शाळांच्या ग्रुपवर पाण्याचे महत्त्व सांगणारे व्हिडिओ पाठवण्यात आले. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी व्हाट्सअप स्टेटसला पाण्याचे महत्व सांगणारे चित्रे, व्हिडिओ लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगली