शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: 'शिवरायांनी अफझलखानाविरुद्ध वापरलेल्या 'या' रणनीतीने होईल कोरोनाचा खात्मा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 13:24 IST

कोरोनाविरोधातील लढ्याला आता विविध मार्गाने बळ मिळत आहे. मास्ट, सॅनिटायझर वाटप करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवरायांची शत्रूशी लढण्याची अनोखी निती आपण महाराष्ट्रातील मावळ््यांनी वापरायला हवी, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देकोरोना लढ्याविरोधात शिवरायांची नीती वापरामराठा क्रांती मोर्चाचे आवाहन : जनप्रबोधनाचे फलक ठरताहेत लक्षवेधी

सांगली : कोरोनाविरोधातील लढ्याला आता विविध मार्गाने बळ मिळत आहे. मास्क, सॅनिटायझर वाटप करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवरायांची शत्रूशी लढण्याची अनोखी निती आपण महाराष्ट्रातील मावळ््यांनी वापरायला हवी, असे आवाहन केले आहे. याप्रकारचे जनप्रबोधनाचे फलक त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल केली असून ती लक्षवेधी ठरत आहेत.मराठा क्रांती मोर्चाने आजवर अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहण्याची भूमिका बजावली आहे. महापुराच्या काळातही मराठा क्रांती मोर्चाने मदतकार्यात मोठी भूमिका बजावली होती. आता कोरोनाच्या संकटातही मराठा क्रांती मोर्चाने जनजागर सुरू केला आहे.

यासंदर्भात विविध प्रकारच्या समाजमाध्यमावर त्यांनी जनजागृतीची पत्रके प्रसिद्ध करून जनतेला आवाहन करण्याचे काम सुरू केले आहे. यात शिवरायांच्या नीतीचे एक आवाहन नागरिकांना सर्वात भावले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे, सहा महिने अफजल खान शिवाजी महाराज व मावळ्यांचा जीव घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी तळ ठोकून बसला होता. शिवाजी महाराज बाहेर निघण्याची वाट पाहत होता.

शिवाजी महाराज तब्बल ६ महिने गडावर शांत बसले, संयम राखला, योजना आखली व सहा महिन्यांनी नोव्हेंबर १६५९ ला अफजल खानाचा मोठ्या शिताफीने वध केला. मित्रांनो आपण त्याच मातीत जन्मलो आहोत. आज त्याच भूमिकेत आपण आहोत.

शत्रू दाराशी आलेला आहे. तो आपण बाहेर निघण्याची वाट पाहत आहे. परंतु आता परीक्षा आहे आपल्या संयमाची ! आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा... आततायीपणा करू नका. शांत डोक्याने विचार करा व या शत्रूचा पराभव करा. हरायचं की हरवायचं, असा सवाल करीत त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची आठवण करून देऊन जनतेमध्ये लढण्याचे साहस निर्माण करण्याचा प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. या आवाहनाचा परिणाम लोकांवर होताना दिसत आहे. ही पोस्ट व्हायरल होतानाच ती लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. याशिवाय अन्य काही जनप्रबोधनाच्या पोस्टही त्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. त्याही लोकांवर प्रभाव टाकत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या