शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

Coronavirus: 'शिवरायांनी अफझलखानाविरुद्ध वापरलेल्या 'या' रणनीतीने होईल कोरोनाचा खात्मा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 13:24 IST

कोरोनाविरोधातील लढ्याला आता विविध मार्गाने बळ मिळत आहे. मास्ट, सॅनिटायझर वाटप करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवरायांची शत्रूशी लढण्याची अनोखी निती आपण महाराष्ट्रातील मावळ््यांनी वापरायला हवी, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देकोरोना लढ्याविरोधात शिवरायांची नीती वापरामराठा क्रांती मोर्चाचे आवाहन : जनप्रबोधनाचे फलक ठरताहेत लक्षवेधी

सांगली : कोरोनाविरोधातील लढ्याला आता विविध मार्गाने बळ मिळत आहे. मास्क, सॅनिटायझर वाटप करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवरायांची शत्रूशी लढण्याची अनोखी निती आपण महाराष्ट्रातील मावळ््यांनी वापरायला हवी, असे आवाहन केले आहे. याप्रकारचे जनप्रबोधनाचे फलक त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल केली असून ती लक्षवेधी ठरत आहेत.मराठा क्रांती मोर्चाने आजवर अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहण्याची भूमिका बजावली आहे. महापुराच्या काळातही मराठा क्रांती मोर्चाने मदतकार्यात मोठी भूमिका बजावली होती. आता कोरोनाच्या संकटातही मराठा क्रांती मोर्चाने जनजागर सुरू केला आहे.

यासंदर्भात विविध प्रकारच्या समाजमाध्यमावर त्यांनी जनजागृतीची पत्रके प्रसिद्ध करून जनतेला आवाहन करण्याचे काम सुरू केले आहे. यात शिवरायांच्या नीतीचे एक आवाहन नागरिकांना सर्वात भावले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे, सहा महिने अफजल खान शिवाजी महाराज व मावळ्यांचा जीव घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी तळ ठोकून बसला होता. शिवाजी महाराज बाहेर निघण्याची वाट पाहत होता.

शिवाजी महाराज तब्बल ६ महिने गडावर शांत बसले, संयम राखला, योजना आखली व सहा महिन्यांनी नोव्हेंबर १६५९ ला अफजल खानाचा मोठ्या शिताफीने वध केला. मित्रांनो आपण त्याच मातीत जन्मलो आहोत. आज त्याच भूमिकेत आपण आहोत.

शत्रू दाराशी आलेला आहे. तो आपण बाहेर निघण्याची वाट पाहत आहे. परंतु आता परीक्षा आहे आपल्या संयमाची ! आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा... आततायीपणा करू नका. शांत डोक्याने विचार करा व या शत्रूचा पराभव करा. हरायचं की हरवायचं, असा सवाल करीत त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची आठवण करून देऊन जनतेमध्ये लढण्याचे साहस निर्माण करण्याचा प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. या आवाहनाचा परिणाम लोकांवर होताना दिसत आहे. ही पोस्ट व्हायरल होतानाच ती लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. याशिवाय अन्य काही जनप्रबोधनाच्या पोस्टही त्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. त्याही लोकांवर प्रभाव टाकत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या