शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

Coronavirus: 'शिवरायांनी अफझलखानाविरुद्ध वापरलेल्या 'या' रणनीतीने होईल कोरोनाचा खात्मा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 13:24 IST

कोरोनाविरोधातील लढ्याला आता विविध मार्गाने बळ मिळत आहे. मास्ट, सॅनिटायझर वाटप करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवरायांची शत्रूशी लढण्याची अनोखी निती आपण महाराष्ट्रातील मावळ््यांनी वापरायला हवी, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देकोरोना लढ्याविरोधात शिवरायांची नीती वापरामराठा क्रांती मोर्चाचे आवाहन : जनप्रबोधनाचे फलक ठरताहेत लक्षवेधी

सांगली : कोरोनाविरोधातील लढ्याला आता विविध मार्गाने बळ मिळत आहे. मास्क, सॅनिटायझर वाटप करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवरायांची शत्रूशी लढण्याची अनोखी निती आपण महाराष्ट्रातील मावळ््यांनी वापरायला हवी, असे आवाहन केले आहे. याप्रकारचे जनप्रबोधनाचे फलक त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल केली असून ती लक्षवेधी ठरत आहेत.मराठा क्रांती मोर्चाने आजवर अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहण्याची भूमिका बजावली आहे. महापुराच्या काळातही मराठा क्रांती मोर्चाने मदतकार्यात मोठी भूमिका बजावली होती. आता कोरोनाच्या संकटातही मराठा क्रांती मोर्चाने जनजागर सुरू केला आहे.

यासंदर्भात विविध प्रकारच्या समाजमाध्यमावर त्यांनी जनजागृतीची पत्रके प्रसिद्ध करून जनतेला आवाहन करण्याचे काम सुरू केले आहे. यात शिवरायांच्या नीतीचे एक आवाहन नागरिकांना सर्वात भावले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे, सहा महिने अफजल खान शिवाजी महाराज व मावळ्यांचा जीव घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी तळ ठोकून बसला होता. शिवाजी महाराज बाहेर निघण्याची वाट पाहत होता.

शिवाजी महाराज तब्बल ६ महिने गडावर शांत बसले, संयम राखला, योजना आखली व सहा महिन्यांनी नोव्हेंबर १६५९ ला अफजल खानाचा मोठ्या शिताफीने वध केला. मित्रांनो आपण त्याच मातीत जन्मलो आहोत. आज त्याच भूमिकेत आपण आहोत.

शत्रू दाराशी आलेला आहे. तो आपण बाहेर निघण्याची वाट पाहत आहे. परंतु आता परीक्षा आहे आपल्या संयमाची ! आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा... आततायीपणा करू नका. शांत डोक्याने विचार करा व या शत्रूचा पराभव करा. हरायचं की हरवायचं, असा सवाल करीत त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची आठवण करून देऊन जनतेमध्ये लढण्याचे साहस निर्माण करण्याचा प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. या आवाहनाचा परिणाम लोकांवर होताना दिसत आहे. ही पोस्ट व्हायरल होतानाच ती लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. याशिवाय अन्य काही जनप्रबोधनाच्या पोस्टही त्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. त्याही लोकांवर प्रभाव टाकत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या