शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

काँग्रेस नेत्यांची खुमखुमी उतरविणार

By admin | Updated: January 3, 2017 23:30 IST

जयंत पाटील : जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ

सांगली : एकट्याच्या जोरावर आमच्याशी लढता येत नसल्याने सगळे मिळून लढत आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची खुमखुमी राष्ट्रवादीच उतरवेल, असा इशारा आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत दिला. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.पाटील म्हणाले की, माझ्याविरोधात वाळवा तालुक्यात सर्व पक्ष एकवटले आहेत. प्रत्येकाला त्यांची स्वतंत्र ताकद किती आहे याची कल्पना आहे. राष्ट्रवादीशी स्वतंत्रपणे मुकाबला करण्याचे धाडस एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे सगळे एकत्र येऊन लढणार आहेत. एकटे आले किंवा सगळे आले तरी आता काहीही फरक पडणार नाही. आम्ही सर्वांना त्यांची जागा दाखवून देऊ. एखादा मतदारसंघ वगळता राष्ट्रवादीची ताकद संपूर्ण जिल्हाभर आहे. याउलट दोन मतदारसंघ वगळता काँग्रेसची ताकद कुठेही नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची खुमखुमी उतरविली जाईल. राष्ट्रवादीने कोणताही प्रस्ताव ठेवला नसताना, काँग्रेसचे नेते आघाडी अमान्य करीत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने निवडणुका लढविण्याचे ठरविले, तर कोणत्याही पक्षाचा आमच्यासमोर निभाव लागणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता निवडणुकीसाठी सज्ज राहावे. महिन्याभरात जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या गावांमध्ये सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्याबाबतची माहिती दिली जाईल. ज्या मतदार संघातील राष्ट्रवादीची ताकद कमी आहे असे वाटते, त्याठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन आम्ही लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत ही लढाई जिंकण्याचा निर्धार सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले. बैठकीस इलियास नायकवडी, अरुण लाड, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, बाळासाहेब होनमोरे, ताजुद्दीन तांबोळी, वैभव शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नोटाबंदी : राष्ट्रवादीचा ९ रोजी मोर्चानोटाबंदीच्या निर्णयाला पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतरही अद्याप शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी आणि अन्य घटकांचा त्रास कमी झालेला नाही. त्यामुळे शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने ९ जानेवारीस सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी कार्यालयापासून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सदाभाऊ खोत, राजू शेट्टींचा निषेधनोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही, असे वक्तव्य करणाऱ्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांचा निषेध बैठकीत करण्यात आला. द्वेष करता तरी किती?जयंत पाटील म्हणाले की, माझा द्वेष किती करायचा, याला मर्यादा आहे की नाही? हे द्वेषाचे राजकारण किती दिवस चालणार आहे? सर्वपक्षीय आघाडीही याच द्वेषापोटी झाली. आम्ही कडेगाव, पलूसमध्ये तसे ठरवले असते, तर काँग्रेसला ते जड गेले असते.