शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

काँग्रेस नेत्यांची खुमखुमी उतरविणार

By admin | Updated: January 3, 2017 23:30 IST

जयंत पाटील : जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ

सांगली : एकट्याच्या जोरावर आमच्याशी लढता येत नसल्याने सगळे मिळून लढत आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची खुमखुमी राष्ट्रवादीच उतरवेल, असा इशारा आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत दिला. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.पाटील म्हणाले की, माझ्याविरोधात वाळवा तालुक्यात सर्व पक्ष एकवटले आहेत. प्रत्येकाला त्यांची स्वतंत्र ताकद किती आहे याची कल्पना आहे. राष्ट्रवादीशी स्वतंत्रपणे मुकाबला करण्याचे धाडस एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे सगळे एकत्र येऊन लढणार आहेत. एकटे आले किंवा सगळे आले तरी आता काहीही फरक पडणार नाही. आम्ही सर्वांना त्यांची जागा दाखवून देऊ. एखादा मतदारसंघ वगळता राष्ट्रवादीची ताकद संपूर्ण जिल्हाभर आहे. याउलट दोन मतदारसंघ वगळता काँग्रेसची ताकद कुठेही नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची खुमखुमी उतरविली जाईल. राष्ट्रवादीने कोणताही प्रस्ताव ठेवला नसताना, काँग्रेसचे नेते आघाडी अमान्य करीत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने निवडणुका लढविण्याचे ठरविले, तर कोणत्याही पक्षाचा आमच्यासमोर निभाव लागणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता निवडणुकीसाठी सज्ज राहावे. महिन्याभरात जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या गावांमध्ये सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्याबाबतची माहिती दिली जाईल. ज्या मतदार संघातील राष्ट्रवादीची ताकद कमी आहे असे वाटते, त्याठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन आम्ही लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत ही लढाई जिंकण्याचा निर्धार सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले. बैठकीस इलियास नायकवडी, अरुण लाड, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, बाळासाहेब होनमोरे, ताजुद्दीन तांबोळी, वैभव शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नोटाबंदी : राष्ट्रवादीचा ९ रोजी मोर्चानोटाबंदीच्या निर्णयाला पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतरही अद्याप शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी आणि अन्य घटकांचा त्रास कमी झालेला नाही. त्यामुळे शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने ९ जानेवारीस सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी कार्यालयापासून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सदाभाऊ खोत, राजू शेट्टींचा निषेधनोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही, असे वक्तव्य करणाऱ्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांचा निषेध बैठकीत करण्यात आला. द्वेष करता तरी किती?जयंत पाटील म्हणाले की, माझा द्वेष किती करायचा, याला मर्यादा आहे की नाही? हे द्वेषाचे राजकारण किती दिवस चालणार आहे? सर्वपक्षीय आघाडीही याच द्वेषापोटी झाली. आम्ही कडेगाव, पलूसमध्ये तसे ठरवले असते, तर काँग्रेसला ते जड गेले असते.