शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सांगलीत काँग्रेसच्या बैठकीत पराभवाचे मंथन : मोठी सभा न झाल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 9:43 PM

भविष्यात चांगली कामगिरी येथे करता येऊ शकते. प्रतापसिंह रजपूत यांनीही, सांगलीतील काँग्रेसची लढत वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून, हा पराभव टाळता येऊ शकत होता, असे मत मांडले.

ठळक मुद्दे प्रदेश कार्यकारिणीकडून अपेक्षा

सांगली : विधानसभा निवडणुकीत सांगली, मिरज या दोन्ही मतदारसंघात झालेल्या पराभवाचे मंथन बुधवारी सांगलीतील काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी, सांगली, मिरजेत मोठ्या नेत्यांच्या सभा न झाल्याने पराभव झाल्याचे मत मांडले. तासाभराच्या चिंतनानंतर, पुन्हा नव्या जोमाने मतदारसंघात ताकद वाढविण्याचा निर्धारही करण्यात आला.

 

सांगलीत काँग्रेस भवनात दुपारी दोन वाजता जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सांगली, मिरजेतील काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले की, सांगलीत काँग्रेसला निसटता पराभव स्वीकारावा लागला. वास्तविक विजयाची शंभर टक्के खात्री होती. पक्षस्तरावरून आणखी बळ मिळायला हवे होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा सांगलीत झाल्या असत्या, तर निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला असता. भविष्यात अशाप्रकारचे दुर्लक्ष टाळायला हवे.

मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे म्हणाले की, सांगली, मिरजेतील नागरिकांच्या मतांचा कौल पाहिला, तर तो भाजपविरोधी होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान काँग्रेसला झाले आहे. आणखी थोडे काटेकोर नियोजन केले असते, तर या दोन्ही जागांवर काँग्रेसला विजय मिळविणे शक्य झाले असते.

दिलीप पाटील म्हणाले की, पलूस-कडेगाव येथे ज्यापद्धतीने वरिष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या, तशा सभा सांगलीत होणे गरजेचे होते. मोठ्या सभांमुळे मतपरिवर्तन होऊ शकते. सांगली जिल्हा अजूनही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भविष्यात चांगली कामगिरी येथे करता येऊ शकते. प्रतापसिंह रजपूत यांनीही, सांगलीतील काँग्रेसची लढत वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून, हा पराभव टाळता येऊ शकत होता, असे मत मांडले.

आटपाडी तालुकाध्यक्ष डी. बी. पाटील म्हणाले की, जिल्'ातील दोन जागा मिळाल्याने ऊर्जा मिळाली असताना, या दोन जागांची भर पडली असती तर आणखी आनंद झाला असता.यावेळी बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब उपाध्ये, शिराळ्याचे रवी पाटील, खानापूरचे तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, विट्याचे सूर्यकांत पाटील, बी. डी. पाटील, डॉ. राजेंद्र मेथे, शेवंता वाघमारे, बिपीन कदम, सनी धोत्रे आदी उपस्थित होते.मी खचलो नाही : पृथ्वीराज पाटीलकाँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, माझा पराभव झाला असला तरी, ८७ हजार नागरिकांनी माझ्या बाजूने कौल दिला आहे. पराभवाने मी खचलेलो नाही. उलट आपत्तीकाळात नागरिकांशी संवाद साधून मी पक्षाचे कार्य सुरू केले आहे. पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी यांनी जी साथ दिली, त्याबद्दल मी समाधानी आहे.चुका टाळून पुढे जाऊ : मोहनराव कदमजिल्हाध्यक्ष कदम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला नियोजनात काही चुका झाल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. पराभवाची कारणमीमांसा प्रत्येकाने केली पाहिजे. कारणांचा शोध घेतल्यानंतर त्या चुका टाळून आपण पुढे गेले पाहिजे. भविष्यात जिल्'ातील पक्षीय संघटन अधिक मजबूत करण्यासाठी एकसंधपणे आपण सर्वजण कार्यरत राहू.

 

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगली