शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

दोघा भाऊंची गट्टी अन् बदलाचे वारे

By admin | Updated: December 15, 2015 00:34 IST

शिराळ्यातील चित्र : शिवाजीराव नाईकांविरोधात राजकीय व्यूहरचना

अशोक पाटील-- इस्लामपूर -शिराळा तालुक्यातील स्थानिक पातळीवरील सर्वच निवडणुकांत तिन्ही मातब्बर गट एकमेकांविरोधात नेहमीच उभे ठाकले जातात. विधानसभा निवडणुकीतही प्रत्येकाने ताकद अजमावली. त्यात शिवाजीराव नाईक सरस ठरले. त्यामुळे आता आगामी सर्व निवडणुकांत राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुखव या दोघा भाऊंनी हातात हात घालून गट्टी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वाळवा-शिराळ्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहे.विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी तोडून स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. याचा त्यांना मोठा फटकाही बसला. विकास आघाडीचे नेते शिवाजीराव नाईक यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून मोदी लाटेवर निवडणूक जिंकली. आता ते मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यांना मंत्रीपद मिळाल्यास त्यांची ताकद वाढणार आहे. याचा परिणाम दोघा भाऊंच्या राजकीय अस्तित्वावर झाला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या दोन भाऊंनी स्वतंत्रपणे मोर्चा काढून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आ. नाईक यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश व्हावा, अशी मागणी केली होती.या घटनेला जवळपास महिन्याभराचा कालावधी लोटला असला तरी, शासनाकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. ‘एक से भले दो’ असे म्हणत सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक यांनी हातात हात घालून १६ डिसेंबरला पुन्हा एकदा शासनाला जाग आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातून शेतकरी येण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. या दोघांच्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकविणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे या मोर्चामागे आमदार नाईक यांना धक्का देण्याची खेळी असल्याची चर्चा आहे.