शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीसाठी भाजपचे सूर बिघडले

By admin | Updated: March 16, 2015 00:05 IST

भाजप हा शिस्त असलेला पक्ष म्हटले जात असले तरी, जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये कोणतीही एकवाक्यता नाही.

सांगली : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनतार्इंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादीने बिनविरोधसाठी सर्व पक्षांना आवाहन केले. काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सर्वच पक्षांनी या आवाहनास लगेच प्रतिसाद देऊन उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपचे घोडे अद्याप अडलेलेच आहे. बिनविरोधच्या मुद्द्यावरून भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांचे सूर बिघडले आहेत. त्यामुळे याबाबत पक्षीय स्तरावर काय निर्णय होणार, याकडे कार्यकर्त्यांचे आणि जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम १0 मार्च रोजी जाहीर झाला. त्यानंतर लगेचच राजकीय हालचालींना वेग आला. राष्ट्रवादीकडून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले होते. शनिवारी अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनतार्इंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, भाजप वगळता सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या मुद्यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. अन्य पक्षांप्रमाणे सुमनतार्इंना भाजपनेही पाठिंबा द्यावा, असे मत जिल्ह्यातील काही नेत्यांनी मांडले, तर काहींनी निवडणूक लढविण्याचा विचार मांडला. दोन मतप्रवाह निर्माण झाल्यामुळेच भाजपचा याबाबत निर्णय होऊ शकला नाही.
सुमनतार्इंची उमेदवारी एकीकडे जाहीर होत असतानाच, भाजपचे खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळ येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या मुद्द्यावर चर्चा केली. कार्यकर्त्यांचीच भावना महत्त्वाची आहे, असे मत घोरपडे यांनी व्यक्त केले होते. कार्यकर्त्यांनी काय भावना मांडल्या, याची माहिती त्यांनी दिली नाही. निवडणूक बिनविरोधची कार्यकर्त्यांची भावना असती, तर दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे कारण नव्हते. त्यामुळे निवडणूक लढविण्याबाबत कार्यकर्ते आग्रही असल्याची चर्चा रंगली आहे. सोमवारी यासंदर्भात पक्षीय स्तरावर निर्णय होणार असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

पक्षांतर्गत गोंधळ
भाजप हा शिस्त असलेला पक्ष म्हटले जात असले तरी, जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये कोणतीही एकवाक्यता नाही. निवडणुकीबाबत कवठेमहांकाळ येथे बैठक घेतली जात असताना, त्यावेळी भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. गेल्या पंधरा दिवसांपासून ही चर्चा सुरू असताना जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, नेते एकत्र येऊन यावर चर्चा करू शकले नाहीत.