शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणी टंचाईची चिंता दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:28 IST

रब्बीसह उन्हाळ्यात सुद्धा भासणार नाही पाणी टंचाई : बोअर, विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. १ फेब्रुवारीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८३ पाझर तलावांमध्ये ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामात व पुढील उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत पाण्याची चिंता नाही. कोणत्याही ठिकाणी टँकर सुरू होतील अशी परिस्थिती नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये मोरना (ता. शिराळा), सिद्धेवाडी (ता. तासगाव), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ), संख, दोडनाला (ता. जत) हे पाच मध्यम प्रकल्प असून, तिथे १,७६० दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची क्षमता आहे. सध्या १ हजार २७९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, ७३ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ७८ लघु प्रकल्प असून, ६ हजार १५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता आहे. याठिकाणी ३ हजार ९८२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ६६ टक्के आहे. मध्यम आणि लघु असे ८३ प्रकल्प जिल्ह्यात आहेत.

जिल्ह्यास नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. प्रत्येक वर्षीच्या उन्हाळ्यात जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकर सुरू होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. परंतु, गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये एप्रिल व मे महिन्यांत अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे या दोन महिन्यांत ग्रामीण भागात फारशी पाणी टंचाई जाणवली नाही. त्यानंतर दोन महिने पावसाने थोडीफार उघडीप दिली. मात्र, त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.

नेहमीच ड्राय भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात एवढा पाऊस झाला की शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील सर्वच तलाव तुडुंब भरले होते. ही एका अर्थाने समाधानकारक बाब ठरली. आता फेब्रुवारी महिना सुरु असून उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत फारशी पाणी टंचाई जाणवणार नाही. तसेच हे जून अखेरपर्यंत पाणी उपलब्ध असेल.

जिल्ह्यातील पाणी साठ्याची स्थिती

तालुका / तलाव संख्या / पाणी साठ्याची टक्केवारी
तासगाव / ७ / ६८
खानापूर / ८ / ७४
कडेगाव / ७ / ६३
शिराळा / ५ / ६९
आटपाडी / १३ / ७७
जत / २७ / ६३
क. महांकाळ / ११ / ६९
मिरज / ३ / ८५
वाळवा / २ / ४७

सद्या १० टक्के जादाच पाणीसाठा

जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०२५ मध्ये ८३ पाझर तलावांमध्ये ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. चालू वर्षी १ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत सद्या १० टक्के पाणीसाठा जास्त आहे. प्रशासन आणि नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर केल्यास आगामी दोन महिने तरी जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असे चित्र आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District Secured: Ample Water Supply Alleviates Scarcity Concerns

Web Summary : Sangli district boasts 68% water storage in dams, eliminating immediate water scarcity fears. Good rainfall filled reservoirs, benefiting rabi crops and easing summer concerns. Tankers unlikely needed, ensuring water availability until June.