शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: August 7, 2015 22:26 IST

दुष्काळाची छाया गडद : अकरा तलाव कोरडे

सांगली : जिल्ह्यातील ७० टक्के लोकसंख्येला आणि पशुधनाला पाणीपुरवठा करणाऱ्या लहान व मोठ्या ८३ तलावांपैकी अकरा तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. ३४ तलावांमध्ये मृत संचय, तर ३३ तलावांमध्ये २५ ते ५० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून, पावसाने अशीच हुलकावणी दिली, तर या पाणीसाठ्याचाही शेतीसाठी उपसा होणार आहे. परिणामी जिल्ह्यावरील दुष्काळाची छाया गडद झाली आहे. जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिके करपू लागली असून ७७ हजार १९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीच झालेली नाही. जिल्ह्यात तासगाव तालुक्यामध्ये सिध्देवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये बसाप्पावाडी, जत तालुक्यात दोड्डनाला, संख आणि शिराळा तालुक्यातील मोरणा असे पाच मोठे तलाव (मध्यम प्रकल्प) आहेत. नऊ तालुक्यांमध्ये ७८ लहान तलाव (लघु प्रकल्प) असून यामध्ये ९३९८.७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सध्या केवळ १६३६.८५ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही मोठ्या पाच तलावांमध्येच १२ टक्के पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार केल्यास, दुष्काळाची छाया गडद झाल्याचे दिसत आहे. सध्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरजपूर्व तालुक्यांतील माळरानावरील खरीप पिके कोमेजू लागली आहेत. आठवड्याभरात पावसाचा जोर वाढला नाही, तर उर्वरित पिकेही वाया जाण्याची भीती आहे. साखरेचे दर पडल्यामुळे कृष्णा-वारणा नदीकाठच्या ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिलेला नाही. त्यामुळे ते शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप पेरण्या वाया गेल्यामुळे दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पदरात पेरणी झालेला खर्चही पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. शासनाने टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांची वीजबिले टंचाई निधीतून भरून दुष्काळी भागाला पाणी देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)७७ हजार हेक्टर नापेरजिल्ह्यातील खरीप पेरणीचे तीन लाख २७ हजार ५८८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाख ५० हजार ४६४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. येथील काही पिके करपली आहेत. उर्वरित ७७ हजार १९१ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणीच झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.खरीप हंगामात पेरणी झाली नाही तेथे रब्बीची पेरणी होणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील पाणीसाठातालुका तलाव मृतसंचय कोरडे तासगाव६३१खानापूर८७०कडेगाव६३०शिराळा४००क़महांकाळ १०६०जत२६१०१०आटपाडी१३४०मिरज३००वाळवा१००एकूण७८३४११२८ गावे, १६७ वाड्यांना टँकरने पाणीजत तालुक्यातील उमराणी, खोजनवाडी, डफळापूर, काराजनगी, अमृतवाडी, सिंदुर, बिळूर, उटगी, हळ्ळी, सुसलाद, बेवनूर, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, येळवी, अंत्राळ, बसर्गी, खंचनाळ, बिरनाळ, व्हसपेठ आदी २३ गावे, खानापूर तालुक्यातील पळशी, हिवरे, घानवड, बाणूरगड, तासगाव तालुक्यातील लोकरेवाडी एक अशी एकूण २८ गावे आणि १६७ वाड्या-वस्त्यांवरील ७१ हजार ३४७ लोकसंख्येला सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. भविष्यात यामध्ये १५७ गावे आणि २४७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.निधी असूनही पैसे भरण्यास शासनाची परवानगी नाहीजिल्हा परिषद प्रशासनाने आॅगस्ट २०१५ पर्यंतचा जिल्ह्याचा ६ कोटी ७३ लाख ६४ हजार रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला होता. या निधीपैकी पाच कोटींच्या निधीची तरतूद ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनांचे वीजबिल भरण्यासाठी केली होती. परंतु, राज्य शासनाने टंचाई नसल्यामुळे सिंचन योजनेचे वीजबिल या निधीतून भरू नये, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे पाच कोटींचा निधी सध्या अखर्चित राहिला आहे.