शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशासाठी यंदा होणार सत्वपरीक्षा

By admin | Updated: May 11, 2015 00:58 IST

सर्वशिक्षा अभियान : अनुदान मंजूर नसल्यामुळे उभा ठाकला प्रश्न

रत्नागिरी : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश योजना राबवण्यात येते. मात्र, यावर्षी अद्याप संपूर्ण निधी मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश कसे द्यायचे, हा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे गणवेश वितरण प्रक्रिया लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थिनी तसेच एससी व एन. टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वर्षाला दोन गणवेश देण्यात येतात. जिल्ह्यातील लाभार्थींची संख्या ७६ कोटी ४३८ इतकी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ४०० रूपये याप्रमाणे शासनाकडून ३ कोटी १५ लाखांच्या निधीची प्रतीक्षा आहे. गतवर्षी शासनाकडून जिल्हा परिषदेकडे तीन टप्प्यात निधी प्राप्त झाला होता.
जिल्हा परिषदेकडे आलेला निधी संबंधित शाळांकडे वर्ग केला जातो. शालेय व्यवस्थापन समितीतर्फे गणवेश शिवून घेण्यात येतात. मात्र, यावर्षी अद्याप निधी मंजूर न झाल्यामुळे गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वितरणाची दरवर्षी घोषणा करण्यात येते. मात्र, शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षीच ती बारगळते. गतवर्षी शासनाने तीन टप्यात निधी दिल्यामुळे जिल्हास्तरावर शिल्लक असलेल्या अनुदानातून लाभार्थी विद्यार्थ्याला किमान एक गणवेश मिळावा, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यावर्षी शिल्लक अनुदानातून गणवेश देण्यात यावेत, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्राकडून वार्षिक आराखडा मान्यता नसल्यामुळे हा निधी बारगळला असल्याचे दिसून येते.
यावर्षीसुध्दा ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित आहे. कारण शालेय व्यवस्थापन समिती गणवेशासाठी ठेका देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मापाप्रमाणे शिवून घेते. अनेक शाळा तयार गणवेश खरेदी करणे उचित समजतात. मात्र, एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व शाळांची मागणी असल्याने संबंधित ठेकेदारांकडून वेळेवर पूर्तता केली जात नाही. किमान महिना, दीड महिना लागतो.
शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शालेय निधी खर्च करण्यात येत असताना त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. एकूणच वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कळून येते. त्याप्रमाणे गणवेश निधी मंजूर करून वर्ग करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन गणवेशाचा लाभ मिळू शकेल. (प्रतिनिधी)