शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाचे म्हणणे काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

कोणताही व्यवसाय करताना त्यातून पैसा कमविणे हेच व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. सुरूवातीला नवनिर्मितीचा आनंद असतो पण जसजसा पैसा मिळत ...

कोणताही व्यवसाय करताना त्यातून पैसा कमविणे हेच व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. सुरूवातीला नवनिर्मितीचा आनंद असतो पण जसजसा पैसा मिळत जातो, तसतशी निर्मितीच्या आनंदाची जागा पैशातून मिळणारा आनंद घेतो. ह्या वाढत्या व्यवसायामुळे निसर्गाची होणारी हानी दुर्लक्षित केली जाते. आपण गणपतीच्या मूर्ती निर्मितीच्याच व्यवसायाचे उदाहरण घेऊया. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सुरुवातीला थोड्या प्रमाणात होणाऱ्या या गणेशोत्सवाने हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. उंचच उंच मूर्ती, त्यातसुद्धा स्पर्धा लागू लागली. वेगवेगळे देखावे व ते बघण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, कुटुंब विभक्त होत गेली तसतशी मूर्तींची संख्या वाढू लागली तसतसे कारखाने वाढू लागले. सार्वजनिक गणेशोत्सवात तर राजकारणही घुसले. नवसाला पावणारा गणपती, हा इकडचा राजा तो तिकडचा राजा अशा निरनिराळ्या बिरुदावली लावून लोकांना आपल्याकडे वळवून घेण्याची स्पर्धा वाढली.

सार्वजनिक गणपती वाढण्यामागचे कारण त्याच्याविषयीची भक्ती नव्हती तर होता वर्गणी मागचा पैसा तसेच नवसाला येणारे दागिने व इतर गोष्टी. आता तर गणपती परदेशातसुद्धा जाऊ लागले, त्यांची निर्यात होऊ लागली. जूनपूर्वीच मूर्तीने भरलेले कंटेनर जहाजाने परदेशी रवाना होतात. हा सर्व पैशांसाठी होणारा खेळ आहे. त्या बाप्पाच्या मूर्तींना आपण एक ‘विक्रेय वस्तू’ नफा मिळवून देणारे उत्पादन बनवलं आहे हे चूक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपती बनविण्यासाठी कोठून तरी परप्रांतातून शाडूची माती आणली जाते, तिच्या मूर्ती बनवून त्या जगभर विकल्या जातात हा पर्यावरणीक अपराध आहे. या व्यापारातून निसर्गाची प्रचंड हानी होते आहे आणि त्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. मुंबईतील मोठे, छोटे गणपती समुद्रात बुडवूनही अखंड राहतात. त्यांना दुसऱ्या दिवशी महानगरपालिका गोळा करून क्रशरमध्ये टाकून बारीक करते. केवढी ही विटंबना त्या गणेशाची. पण दरवर्षी हे होतच असते व त्याचे सुखदुःख कोणालाच नसते. सध्याच्या महागाईत कितीतरी जण केवळ नाईलाज म्हणून बाप्पा आणतात, कारण खर्च करण्याची त्यांची ऐपत नसते. एकदा आणला की कायमचा आणला पाहिजे, ही अंधश्रद्धा त्यांना तसे करायला भाग पाडते. चराचरात ईश्वराचे अस्तित्त्व आहे. असे असताना घरात गणपती आणला तरच त्याचे अस्तित्व आहे हे मानणे किती योग्य आहे? टिळकांनी गणपती आणला तोच मुळी राजकारणाच्या दृष्टिकोनातून शिवजयंतीला ‘काऊंटर ॲटॅक’ म्हणून.

बाप्पाचे विसर्जन करण्याचा मन उद्विग्न करणारा एक प्रकार मला मध्यप्रदेश व धुळे येथे बघायला मिळाला. जयपूरवरून आम्ही पुण्याला येत होतो. रात्री दीड वाजता आम्ही शिरपूर गावात पोहोचलो. त्या गावातून दुभाषी नदी वाहते, नदीवर पूल आहे पण नदीवर जाण्यासाठी मार्ग नाही. आम्ही जेव्हा पुलावर आलो तेव्हा तेथे दोन मोठे गणपती ‘लॉरी’मधून पोलीस बंदोबस्तात आणले होते. त्यांच्याबरोबर एक क्रेनसुद्धा होती. पुढे काय होतंय ते पाहण्यासाठी आम्ही पुढे जाऊन थांबलो, दोन लॉऱ्यांपैकी एक पुलाच्या एका बाजूला तर दुसरी पुलाच्या दुसऱ्या बाजूला खेटून उभी राहिली, बाप्पाची उंची पुलाच्या रेलिंगच्या वरती होती. बाप्पाच्या नावाचा गजर झाला, क्रेन पुढे सरकली व तिच्या हुकाने मागच्या बाजूने बाप्पाला जोरकस धक्का दिला आणि बाप्पा नदीत पडला. दोन्ही बाप्पांचे असेच विसर्जन झाले याला विसर्जन म्हणावे का? एवढ्या उंचीवरून बाप्पाला अक्षरशः फेकून दिले होते. लहान, मोठ्या सगळ्याच बाप्पांचे विसर्जन असेच होते. या सगळ्या प्रकारात त्या गजाननाविषयी श्रद्धा कोठेच दिसून येत नाही. सगळीकडे नुसता व्यापार. गणेशमूर्तीला क्रय-विक्रेय वस्तू बनवून टाकली आहे. मूर्ती बनविणारे व मूर्ती घेणारे निर्बुद्धपणे या व्यवस्थेचा भाग बनले आहेत.

गणेशमूर्तीचा उद्योग गोत्यात आणून गणपती हेच सांगायचा प्रयत्न करतोय मातीशी नातं जोडा, स्थानिकतेला जोपासा, निसर्गाला जपा आणि हे जेव्हा कोणाला ऐकू येत नाही त्यावेळी शेवटचा उपाय म्हणून ही परिस्थिती निर्माण करून त्याने ह्यांच्या पाठीत सणसणीत रट्टा दिला आहे. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही, भानावर या आणि बदल करा.

- डॉ. मीनल कुष्टे, लांजा