शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

रत्नागिरीतील पाणीपुरवठा सुरळीत : नगराध्यक्ष साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:32 AM

रत्नागिरी : गेले दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, बुधवारपासून सुरळीत झाला आहे. काही ठिकाणी वाहिन्यांमध्ये ...

रत्नागिरी : गेले दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, बुधवारपासून सुरळीत झाला आहे. काही ठिकाणी वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असला तरी येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा चांगल्या दाबाने व सुरळीत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

शीळ धरण येथे दोन पंप बसविण्यात आले असून, २४ तास पंप चालवूनदेखील पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लोव्ह होत नव्हत्या. मात्र, नवीन पंपामुळे टाक्या काही तासांतच भरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. मात्र, त्यानंतर शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. डीएसपी लाईनजवळील टाकी सुरू करून चांगल्या पध्दतीने पाणीपुरवठा होणार आहे. शिवाय, शहरातील जुन्या टाक्या स्वच्छ करून नादुरुस्त झालेल्या भागाची दुरुस्ती व रंगकाम केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शहरातील बहुतांश ठिकाणची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. वडापाव विक्रेत्यांनाही पार्सल विक्रीबाबतची सूचना करण्यात आली आहे. पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी नगर परिषदेच्या भरणा केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी मारूती मंदिर येथेही वसुली केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी स्वतंत्र दोन बाॅक्स तयार करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये अर्ज टाकायचे आहेत. दाखल्यांबाबतच्या सूचना नागरिकांना फोनवर देण्यात येईल. त्यानंतर त्यांनी ते घेऊन जावेत. नगर परिषदेमध्ये अभ्यागतांसाठी सध्या प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक वही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे निवारण तत्काळ केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील रस्ता दुरस्ती व डांबरीकरणाचे काम १५ एप्रिलनंतर सुरू केले जाणार आहे.

यावेळी मुख्याध्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आरोग्य सभापती निमेश नायर, नगरसेवक राजन शेट्ये आदी उपस्थित होते.