शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

थर्डी फर्स्टसाठी पर्यटकांना लागले कोकणचे वेध; गणपतीपुळे, वेळणेश्वरला विशेष पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 5:46 PM

पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांची पसंती असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील निवासस्थानांचे आरक्षण ७५ ते ८० टक्के झाले आहे.

रत्नागिरी : डिसेंबर महिना सुरू होताच, आता पर्यटकांना कोकणचे वेध लागले आहेत. हळूहळू थंडीला सुरुवात झाल्याने या आल्हाददायी वातावरणात भटकंती करण्यासाठी पर्यटकांची तयारी सुरू झाली आहे. आठ डिसेंबरपासून पर्यटक जिल्ह्यात येण्यास सुरुवात होत आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांची पसंती असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील निवासस्थानांचे आरक्षण ७५ ते ८० टक्के झाले आहे.कोकणात थंडीच्या हंगामात पर्यटनाला बहर येतो. कोरोना काळात दोन वर्षे पर्यटन पूर्णपणे थांबले होते. गेल्या डिसेंबरपासून कोरोना कमी झाल्याने पुन्हा हळूहळू पर्यटन वाढू लागले आहे. गेल्या वर्षभरात पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मे महिन्याप्रमाणेच यंदा हिवाळी पर्यटनासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.शाळा - महाविद्यालयातील मुलांच्या प्रथम सत्रातील परीक्षाही आता आटोपल्या आहेत. त्यामुळे  थंडीच्या ‘हेल्दी सीझन’मध्ये पर्यटक जिल्ह्यातील नयनरम्य पर्यटन स्थळांकडे येण्यासाठी उत्सुक आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांकडे पर्यटकांची पावले आताच वळली आहेत. त्याचप्रमाणे गुहागर येथील वेळणेश्वरला पर्यटकांची अधिक पसंती असते. त्या दोन्ही ठिकाणच्या एमटीडीसीच्या निवासस्थानांचे आरक्षण वाढू लागले आहे. ८ डिसेंबरपासून अगदी ५ जानेवारीपर्यंत गणपतीपुळे येथील आरक्षण आताच ७५ ते ८० टक्के झाले आहे. त्याचबरोबर वेळणेश्वरचेही आरक्षण होऊ लागले आहे.रत्नागिरीतील सागरकिनाऱ्यांचे पर्यटकांना विशेष आकर्षण असल्याने गणपतीपुळे, पावस ठिकाणी येणारे पर्यटक सागर किनाऱ्यांकडेही मोठ्या प्रमाणावर वळतात. त्यामुळे आता हळूहळू रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढण्यास सुरुवात होणार आहे. सध्या वातावरण अधिकच आल्हाददायी असल्याने नाताळच्या सुटीसाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात दीर्घ काळ राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. पर्यटकांना विविध प्रकारच्या सुविधा देण्यासाठी विविध पर्यटन व्यावसायिकही पुढे सरसावले आहेत.पर्यटकांसाठी एमटीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात २५६ निवास न्याहरी योजनेचे लाभार्थी सेवा देत आहेत. या व्यवसायात येण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा एमटीडीसीकडून देण्यात आली आहेत. एमटीडीसीची सर्व निवासस्थाने पर्यटकांसाठी सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.  खासगी व्यावसायिकांनीही त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.संस्कृती उलगडणारपर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने ‘महाभ्रमण’ ही नावीन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून त्या त्या भागातील संस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृती आदींची ओळख पर्यटकांना करून देणे, हा मुख्य उद्देश आहे. याद्वारे जिल्ह्यातही कृषी पर्यटन, निसर्गरम्य स्थळांचे आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी पर्यटन व्यावसायिक करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. एमटीडीसीच्या गणपतीपुळे येथील निवासस्थानाचे आरक्षण ८ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीसाठी आताच ७५ ते ८० टक्के झाले आहे. हा कालावधी १५ जानेवारीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यंदाचा हिवाळी पर्यटनाचा हंगामही हाऊसफुल्ल जाईल. - संजय ढेकणे, व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (कोकण विभाग)

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNew Yearनववर्ष