शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

Ratnagiri, Tiware Dam Breach Update : तिवरे धरणाला भगदाड, दुर्घटनेतील बेपत्ता लोकांच्या नावाची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 11:26 IST

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत.

ठळक मुद्देचिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत.मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत.

रत्नागिरी -  चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत. मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. धरणाजवळचा दादर पूल पाण्याखाली आला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी संपर्क तुटला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने त्यात अजून पावसाची भर पडली तर धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली असून, परिस्थितीचे अवलोकन केले जात आहे.या धरणाचे ओव्हरफ्लो होणारे पाणी शास्त्री नदी आणि वाशिष्ठीच्या खाडीला मिळत असल्याने त्याचा ग्रामस्थांना धोका नसल्याची माहिती मिळत आहे.

या दुर्घटनेतील बेपत्ता असलेल्या लोकांची नावे

अनंत हरिभाऊ चव्हाण (63)अनिता अनंत चव्हाण (58)रणजित अनंत चव्हाण (15)ऋतुजा अनंत चव्हाण (25)दुर्वा रणजित चव्हाण (1.5)आत्माराम धोंडू चव्हाण (75)लक्ष्मी आत्माराम चव्हाण (72)नंदाराम महादेव चव्हाण (65)पांडुरंग धोंडू चव्हाण (50)रवींद्र तुकाराम चव्हाण (50)रेश्मा रविंद्र चव्हाण (45)दशरथ रविंद्र चव्हाण (20)वैष्णवी रविंद्र चव्हाण (18)अनुसिया सीताराम चव्हाण (70)चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75)बळीराम कृष्णा चव्हाण (55)शारदा बळीराम चव्हाण (48)संदेश विश्वास धाडवे (18)सुशील विश्वास धाडवे (48)रणजित काजवे (30)राकेश घाणेकर (30)

पाणी ओव्हरफ्लो झाल्याने जवळच असलेला दादर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चिपळूणाचा आकले, रिक्टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला आहे. तिवरे धरण ओसंडून वाहू लागल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 21 जण या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण घटनास्थळी रवाना झाले आहेत.

नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

माजी सभापती  जितेंद्र चव्हाण रामपूर यांची माहीती - दसपटी तिवरे ते पाणी वाशिष्टी नदीला मिळत. त्याठिकाणी  नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि बांधकामचे अधिकारी पोहचलेत, बाधित गावे वालोटी, दळवटने, गाणे ,सती, चिंचघरी, खेर्डी चिपळूण अशी आहेत.

 

टॅग्स :Ratnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरणDamधरणriverनदीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी