शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय सेवेचे तीनतेरा

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

फुणगूस केंद्र : आरोग्य व्यवस्थेबाबत सामान्यांमध्ये नाराजी

फुणगूस : जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या आडमुठ्या धोरणामुळे फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार म्हणजे वाऱ्यावरची वरात झाली आहे. कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांची वानवा असून, सातत्याने रिक्त पदे भरण्याबाबत मागणी करुनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खाडीभागातील जनतेच्या संतापाचा पारा चढला असून, याची जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास येथील जनता खाडीभाग हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य अनिल ऊर्फ पप्पू सुर्वे यांनी दिला आहे.सुमारे २० ते २५ गावांतील जनतेच्या रुग्णसेवेसाठी येथील आरोग्य केंद्र हे एकमेव आधार केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या क्षेत्राचा विस्तार तसेच रुग्णसंख्या पाहता येथे कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांची वानवा आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. अंकुश वानखडे यांची गडचिरोली येथे प्रशासकीय बदली झाल्यानंतर एकमेव कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्ण तपासणीसह शालेय विद्यार्थी तपासणी, उपकेंद्र भेटी, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया कॅम्प, तालुका तसेच जिल्हा सभा आदी केंद्रबाह्य कामांसाठी जावे लागते. मैलोन्मैल अंतरावरुन येणाऱ्या रुग्णांना बऱ्याच वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत ताटकळत राहावे लागते, तर काही वेळा हिरमुसले होत तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते.
या भागात जवळपास खासगी वा शासकीय दवाखाना नसल्याने प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना आरोग्यकेंद्र हेच एकमेव आधारस्तंभ आहे. परंतु मुख्यालयी महिला आरोग्यसेविका नसल्याची वर्षभर ओरड आहे.
वैशाली यादव यांच्या प्रशासकीय बदलीचे कर्तव्य पार पाडणाऱ्या संबंधित यंत्रणेला त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्याचा विसर पडला आहे. उपकेंद्र महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना फिरतीची कामे, सभा आदी कार्यक्रम दिवसभरात आटोपून आळीपाळीने आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी मुख्यालयाचाही कारभार सांभाळावा लागत आहे.
तीच तऱ्हा उपकेंद्रांचीही आहे. पोचरी येथे सुशोभित उपकेंद्राची इमारत असून, येथे सहा ते सात वर्षे पुरुष आरोग्यसेवक तसेच मांजरे येथेही सात ते आठ वर्षे पुरुष आरोग्यसेवक नाही. त्यामुळे येथील लोक गावच्या ठिकाणी मिळणाऱ्या आरोग्य सेवा तसेच आरोग्यविषयक जनजागृतीपासून वंचित आहेत. येथील ग्रामपंचायत स्तरावरुन ठरावपत्र देण्यात आले. परंतु त्याचीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संपूर्ण खाडीभाग जनतेतून संतापाचा सूर निघत आहे.
आता तरी हा खेळ थांबवावा अन्यथा खाडीभागातील जनता आपला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा खाडीभाग येथील ग्रामस्थांच्यावतीने अनिल ऊर्फ पप्पू सुर्वे यांनी दिला आहे. फूणगूसचा हा प्रश्न कायमचा सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)