शहरं
Join us  
Trending Stories
1
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
2
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
3
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
4
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
5
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
6
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
7
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
8
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
9
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
10
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
12
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
13
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
14
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
15
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
16
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
17
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
18
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
19
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
20
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीपेक्षा टंचाई कमी

By admin | Updated: March 31, 2015 00:22 IST

थोडा दिलासा : अवकाळी पावसाचा असाही परिणाम

रत्नागिरी : अवकाळी पाऊस पडल्याने गतवर्षीपेक्षा यंदा पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. चालू आठवड्यामध्ये जिल्ह्यात केवळ ४ गावातील ४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु असून, त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ त्यामुळे धनगरवाड्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून कित्येक मैल पायपीट करावी लागते़ येथील जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत़जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही खडकाळ भागामुळे पाणी जमिनीत न मुरता नदी, नाल्यांद्वारे ते समुद्राला मिळते. त्यामुळे येथे भीषण पाणीटंचाई उद्भवत आहे़ त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला तो काही प्रमाणात जनतेची तहान भागविणारा ठरला आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाल्याने लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे. अवकाळी पावसाचा परिणाम पाणीटंचाई कमी होण्यावर झाला आहे. आजच्या पाणीटंचाईची स्थिती पाहता गतवर्षीपेक्षा यंदा टंचाईग्रस्त गावांतील वाड्यांची संख्या कमी आहे. गतवर्षी ७ गावांतील ७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. चालू स्थितीत जिल्ह्यात केवळ ४ गावातील ४ वाड्यांमध्येच भीषण पाणीटंचाई सुरु आहे. टंचाईग्रस्तांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. त्यामुळे शासनाकडून टंचाईग्रस्तांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, यासाठी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. (शहर वार्ताहर)