शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:13 IST

India and Pakistan Relation: केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गेल्या १०-१२ वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे कमालीचे तणावपूर्ण राहिलेले आहेत.दरम्यान, भारत आणि पाकिस्तानकडून परस्पर संबंध पुन्हा एकदा स्थापित  करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गेल्या १०-१२ वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे कमालीचे तणावपूर्ण राहिलेले आहेत. गतवर्षी झालेला पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी राबललेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमधील संबंध हे आणखीनच बिघडले होते. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानकडून परस्पर संबंध पुन्हा एकदा स्थापित  करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच भाग म्हणून गेल्या तीन महिन्यांमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये दोनवेळा चर्चा झाली आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही या चर्चेची कल्पना आहे.

ऑपरेशन सिंदूरची वर्षपूर्ती होत असतानाच गेल्या वर्षभरात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही. मात्र गेल्या ३ महिन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानचे माजी जनरल तसेच निवृत्त मुत्सद्दी किमान  दोन वेळा भेटले आहेत. त्यामधील एक बैठक ही कतार येथे तर दुसरी बैठक ही इतर कुठल्या तरी आशियाई देशाच्या राजधानीमध्ये झाली. मात्र ह्या बैठका म्हणजे पडद्याआडून साधण्यात आलेला औपचारिक संवाद नव्हे, असेही सांगण्यात येत आहे. पण ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमधील संवादाची ही पहिलीच वेळ असल्याने तिला अधिक महत्त्व आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात पडद्याआड सुरू असलेल्या या चर्चांबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्यालयाला कल्पना आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयालाही पाकिस्तानने व्यक्त केलेल्या या इच्छेबाबत कल्पना देण्यात आली आहे. तसेच  पडद्याआडून सुरू असलेल्या या चर्चेबाबत राजकीय पातळीवरून अद्याप  कुठलाही निर्णय  घेण्यात आलेला नाही. 

मात्र कुठल्याही हल्ल्याच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या तणावाचं व्यवस्थापन करण्याचा मार्ग शोधणे हे या चर्चेमागचं प्रमुख कारण होतं,असे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत या दोन्ही देशांमध्ये अशा क्रायसिस मॅनेजमेंट सिस्टिमचा अभाव आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान, दोन्ही देशांमध्ये संवादाचं एकमेव माध्यम हे दोन्ही देशांच्या डीजीएमओमधील हॉटलाईन हेच होते. तसेच आजही दोन्ही देशांमधील डीजीएमओ हे आठवड्यातून एकदा संवाद साधतात.

English
हिंदी सारांश
Web Title : India, Pakistan Engage in Backchannel Talks Amidst Tensions

Web Summary : Despite strained relations, India and Pakistan have reportedly held two backchannel meetings in the past three months, facilitated by former officials, to explore crisis management strategies. National Security Advisor Ajit Doval is aware of these discussions, aimed at mitigating tensions.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरInternationalआंतरराष्ट्रीय