शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांना अखेर मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:34 IST

रत्नागिरी : राज्यातील बालकल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांची तीन वर्षांची मुदत संपल्याने त्यांचा कार्यभार जवळच्या जिल्ह्यातील बालकल्याण ...

रत्नागिरी : राज्यातील बालकल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांची तीन वर्षांची मुदत संपल्याने त्यांचा कार्यभार जवळच्या जिल्ह्यातील बालकल्याण समितीच्या मुदत असलेल्या सदस्यांकडे देण्यात यावा, असे शासनाने परिपत्रक काढले होते. मात्र, त्यात सुधारणा करून नवीन अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती होईपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून तसे परिपत्रक गुरुवारी काढण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून बालकल्याण समितीच्या कामकाजात संदिग्धता निर्माण झाली होती. काही समित्यांच्या अध्यक्षांची तसेच सदस्यांची मुदत संपल्याने कामकाज करावे कसे, हा तांत्रिक मुद्दा होता. यावर पर्याय म्हणून शासनाने २० रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार लगतच्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या समितीच्या सदस्यांकडे कार्यभार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोनच दिवसांनंतर यात बदल करण्यात आला आहे. गुरुवारी काढलेल्या परिपत्रकानुसार ६ एप्रिल २०१८ च्या अधिसूचनेनुसार नियुक्त झालेल्या आणि तीन वर्षांचा कालावधी संपलेला आहे, तरीही सध्या कार्यरत आहेत अशा राज्यातील बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य यांना ‘विशेष बाब’ म्हणून नवीन अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम २७(६) मध्ये बालकल्याण समितीच्या अध्यक्ष तथा सदस्यपदावर तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी नियुक्त केले जाणार नाही अशी तरतूद आहे. राज्यातील बहुसंख्य बालकल्याण समितीवरील अध्यक्ष तथा सदस्य यांच्या नियुक्ती एप्रिल २०१८ च्या अधिसूचनेनुसार झाल्या असल्याने त्यांचा तीन वर्षांचा कालावधी नुकताच संपुष्टात आला होता. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून नवीन नियुक्तीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, सद्य:स्थिती विचारात घेता, त्यापुढील प्रक्रियेसाठी दीर्घकाळ लागणार आहे. अशा वेळी नवीन अध्यक्ष आणि सदस्यांची निवड होईपर्यंत कार्यरत पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा सोपा आणि समयाेचित निर्णय शासनाने घेतला आहे. मुदतवाढ मिळाल्याने या सदस्यांना आता त्यांचे आतापर्यंतचे नियमित कामकाज पुढे चालू ठेवता येणार आहे.

चौकट

शासनाने मुदत संपलेल्या सदस्यांचा कार्यभार इतर जिल्ह्यांमधील सदस्यांकडे देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तसे झाले असते तर ऑनलाइन कामकाज करणे, आदेश देणे, बालक-पालक संवाद साधला जाणे, रेकाॅर्ड तयार करणे, रात्री-अपरात्री येणाऱ्या प्रकरणांत निर्णय प्रक्रिया, बालकांचे समर्पणाचे बंधपत्र घेणे, बालकांना दत्तक प्रक्रियेसाठी विधिमुक्त करणे, संस्थेतील बालकांना कुटुंबात पुनःस्थापित करणे या प्रक्रिया करताना, जिल्ह्यातील संस्थांसोबत संवाद ठेवून कामकाज करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या.