शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

शीळ येथे साठवण टाक्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:36 AM

अवेळच्या पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाºयाने आंब्याचे झाड कोसळून पाण्याच्या साठवण टाक्यांचे नुकसान झाल्याची घटना शहरानजीकच्या शीळ येथे रविवारी

ठळक मुद्देग्रामस्थांचे साठ ते सत्तर हजारांचे नुकसान झाले आहेटाक्यांच्या दुरवस्थेमुळे बाईतवाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरेअद्याप संबंधित वाडे आणि गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही

राजापूर : अवेळच्या पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाºयाने आंब्याचे झाड कोसळून पाण्याच्या साठवण टाक्यांचे नुकसान झाल्याची घटना शहरानजीकच्या शीळ येथे रविवारी रात्री घडली. यामध्ये साठवण टाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यामुळे लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवेमध्ये कमालीचा उष्मा वाढला आहे. त्यातून, नैसर्गिक जलस्रोत कमालीचे खालावले आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईची झळ पोहोचत असून, त्या गावांनी पंचायत समिती प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणीही केली आहे. मात्र, अद्याप संबंधित वाडे आणि गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. वाढत्या उष्म्यामध्ये अंगाची लाहीलाही होत असताना गेले दोन दिवस सायंकाळी तालुक्यामध्ये पाऊस पडला. 

पावसाच्या जोडीला सोसाट्याचा वाराही होता. त्याचा फटका अनेक आंबा बागायतदारांना बसला. या सोसाट्याच्या वाºयामध्ये शीळ वरची बाईतवाडी येथील पाण्याच्या साठवण टाक्यांवर आंब्याचे झाड कोसळून या टाक्यांचे नुकसान झाले आहे.

शीळ वरची बाईतवाडी ग्रामस्थांनी स्वखर्चाने खासगी नळपाणी योजना राबविली आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील अर्जुना नदीवरून पाईपलाईन टाकून त्याद्वारे वाडीमध्ये पाणी आणले आहे. नदीवरून पाईपद्वारे आलेल्या पाण्याचा साठा करण्यासाठी दोन टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. या साठवण टाक्यांवर आंब्याचे झाड पडल्याने टाक्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यामध्ये ग्रामस्थांचे साठ ते सत्तर हजारांचे नुकसान झाले आहे. 

सध्या वाढत्या उष्म्यामध्ये पाण्याचे स्रोत खालावले असून, पाणीटंचाईच्या झळा लोकांना पोहोचत आहेत. अशा स्थितीत आंब्याचे झाड कोसळून खासगी नळपाणी योजनेच्या साठवण टाक्यांच्या दुरवस्थेमुळे बाईतवाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी