शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गांभीर्य दाखवा, अन्यथा अनर्थ ओढवेल - कदम

By admin | Updated: July 4, 2015 00:13 IST

महावितरणला झटका : दापोलीच्या आमदारांनी घेतले फैलावर

दापोली : तालुक्यातील अनेक गावे अंधारात आहेत. काही गावांची १५ ते २० दिवस लाईट नाही. त्यातच जनतेला रॉकेल मिळत नाही. दुसरीकडे वारंवार वीज गायब होतेय. जनतेने जगायचे कसे, असा संतप्त सवाल करत दापोली महावितरण कंपनीला लोकांना वीज देता येत नसेल तर कार्यालयाला टाळे लावण्यात येईल, असे खडे बोल त्यांनी सुनावले. यापुढे जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने पहा. जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्यास अनर्थ होइल, असा इशारा दापोलीचे आमदार संजय कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना झालेल्या बैठकीत दिला.दापोली शहरात गेले चार दिवस वीज नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला. दापोली तालुक्यातील दाभोळ सबसेंटर, कुडावळे, हर्णै, केळशी या भागातील अनेक गावात १० ते १५ दिवस लाईट नाही. ग्रामीण भागातील जनता अंधारात आहे. अनेक ठिकाणचे वीजखांब वाऱ्यामुळे उन्मळून पडले आहेत.याबाबत महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला जातो. मात्र अधिकारी, कर्मचारी त्याबाबत गंभीर नाहीत. गंजलेले धोकादायक पोल बदलणे, ज्या ठिकाणी नवीन पोल उभे करायचे आहेत ते करुन घेणे, पावसाळ्यात कर्मचाऱ्याने सतर्क राहणे आदी सूचना आमदार संजय कदम यांनी दिल्या.मुरुड, लाडघर, कर्दे ही पर्यटनस्थळे आहेत. येथील हॉटेल व्यावसायिक लाखो रुपयांची बिले भरत आहेत. तरीही मागणीच्या प्रमाणात वीजपुरवठा होत नाही. कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर असल्याने हॉटेलमध्ये विजेचा योग्य सप्लाय होत नाही. हॉटेल्समधील एसी चालत नाहीत. फॅनचा स्पीड कमी होतो. त्यामुळे नवीन जास्त होल्टेजचे ट्रॉन्सफार्मर बसवून मिळावेत, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक शैलेश मोरे, मंगेश मोरे यांनी केली.दापोलीचे आमदार संजय कदम यांनी तालुक्यातील सर्व गावांचा विजेचा आढावा घेतला. या बैठकीत अनेक समस्यांवर तोडगा काढण्यात आला. जालगाव - बौद्धवाडी येथील दारिद्र्यरेषेखालील वस्तीचे काम गेली दोन वर्षे स्थगित आहे. यावर तोडगा काढण्यात आला. ज्या गावात लाईटबाबत तक्रारी आहेत, यावर तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्याने दिले. या बैठकीला महावितरणचे सर्व अधिकारी उपस्थित होते. पाठपुरावा करण्यावर त्यांनी तडजोड सहन करणार नाही असे सांगितले. (प्रतिनिधी)तालुक्यातील वाढता पर्यटन व्यवसाय लक्षात घेता यापुढे केवळ हॉटेल व्यवसायासाठी वेगळ्या सबस्टेशनचा प्रस्ताव पाठवू. त्यासाठी लागणारी सरकारी जागा उपलब्ध झाल्यास केंद्र सरकारच्या दिनदयाळ योजनेतून सब सेंटर उभारण्यात येईल. भविष्यात हॉटेल व्यावसायिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊ.- एस. एस. माने, महावितरण अधिकारी, दापोली