शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिवसेनेचेच वर्चस्व

By admin | Updated: April 24, 2015 01:23 IST

ग्रामपंचायत निवडणूक : ४६१ पैकी ३०७ ग्रामपंचायतींवर भगवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४६१ पैकी ३०७ ग्रामपंचायतींवर भगवा फडकावीत शिवसेनेने जिल्ह्यावरील आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवले आहे. ४६१ पैकी १३२ ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस दुसऱ्या, तर विविधरंगी गाव पॅनेल्स तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. भाजपने प्रथमच स्वतंत्र निवडणूक लढवीत रत्नागिरी, दापोली आणि गुहागरमध्ये काही ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप एकत्र होते. विधानसभा निवडणुकीत ही युती तुटली. ग्रामपंचायतींची ही निवडणूक दोघांनी स्वबळावर लढविली. त्यामुळे प्रत्येक पक्ष किती पाण्यात आहे, याची चाचणीही या निवडणुकीने पुन्हा एकदा झाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ५० पैकी ४१ ग्रामपंचायती सेनेकडे आल्याची माहिती तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गतवेळेपेक्षा तालुक्यात यावेळी चार ग्रामपंचायती सेनेला अधिक मिळाल्या आहेत. त्याचवेळी सेनेची सत्ता असलेल्या चाफे, नांदिवडे व सांडेलावगण या ग्रामपंचायती सेनेकडून भाजपने हिसकावल्या आहेत. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींवर भाजपला सत्तेची संधी मिळाल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी दिली. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आलेल्या संगमेश्वर खाडीपट्टा भागातील सहा ग्रामपंचायतीही शिवसेनेने जिंकल्या आहेत.
गुहागर तालुक्यातील २१ ग्रामपंचायत निवडणुकीत १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने बाजी मारली आहे. सहा ग्रामपंचायतींवर सेना-भाजपने, तर गावविकास पॅनेल्सनी तीन ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी मंत्री व सध्याचे आमदार भास्कर जाधव यांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने या तालुक्यात आपली ताकद दाखविली आहे.