शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

काही दिवसांनी शिवसेना सत्तेत नसेल : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आरवली : राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, पण येथे विराेध करायला केवळ १२ झेंडे दिसत आहेत. हिंदुत्वाशी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरवली : राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, पण येथे विराेध करायला केवळ १२ झेंडे दिसत आहेत. हिंदुत्वाशी गद्दारी करून हे मुख्यमंत्री झाले असून, काही दिवसांनी शिवसेना सत्तेत नसेल, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आरवली (ता. संगमेश्वर) येथील कार्यक्रमादरम्यान केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आयाेजित करण्यात आली आहे. ही यात्रा संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे आल्यानंतर छाेटेखानी कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते. नारायणे राणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात मुंबईतून करण्यात आली. ही यात्रा आता काेकणात आली आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलाे आहे. तुमचे आशीर्वाद घेऊन कॅबिनेट मंत्री म्हणून सर्वसामान्य तरुणांच्या हाताला राेजगार मिळवून देणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेवर जाेरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्यात यांची सत्ता आहे. मात्र, याठिकाणी विराेध करण्यासाठी केवळ १२ झेंडे दिसत आहेत. हीच त्यांची काय ताकद आहे हे कळते. पाेलीस मित्रांनी या सर्वांना वेळीच आवरावे. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले तर यांची पळताभुई थाेडी हाेईल. त्यांना घरी पाठवा नाहीतर आम्ही घरी पाठवू, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

—————————-

काेकणात नवे उद्याेग उभे करणार

कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्या खात्याचा उपयाेग काेकणाचा कायापालट करणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. सूक्ष्म व लघु उद्याेग मंत्री म्हणून तरुणांसाठी राेजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. काेकणात नवे उद्याेग उभे करून राेजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

———————————————-

जाेरदार घाेषणाबाजी

आरवली येथील कार्यक्रमादरम्यान नारायण राणेंचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते जमा झाले हाेते. यावेळी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत जाेरदार घाेषणाबाजी केली. कार्यक्रमादरम्यान काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाेलिसांचे कडे घालण्यात आले हाेते.