शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सर्प, विंचू, श्वानदंशाचे सात हजार रुग्ण

By admin | Updated: December 28, 2014 00:11 IST

जिल्हा परिषद : एकही रुग्ण दगावला नसल्याचा दावा

रहिम दलाल / रत्नागिरीजिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यामध्ये सर्पदंश, विंचूदंश आणि श्वानदंशाच्या एकूण ६०९७ घटना घडल्या़ मात्र, या दंश झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नसल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे़ जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी विंचू, साप आढळून येतात़ साप, विंचू चावल्यानंतर काही वेळाच विष शरीरात भिनते़ त्यानंतर दंश केलेल्या व्यक्तीला मरणयातना सहन कराव्या लागतात़ दंश केलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार न झाल्यास तो दगावण्याची शक्यता जास्त असते़ विंचूदंशानंतर वेळीच वैद्यकीय उपचार होणे आवश्यक आहे़ ग्रामीण भागामध्ये अजूनही काही ठिकाणी वनस्पतीच्या आधारे विंचूदशांवर उपचार करण्यात येतो़ जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागामध्ये श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ शहरी भागात संबंधित नगर परिषदा आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींकडून श्वानांची संख्या कमी करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत़ शहरी भागात श्वान टोळ्यांनी फिरताना दिसतात़ नवीन व्यक्ती दिसल्यास त्यांच्यावर हल्ला करतात़, तर जनावरांनाही श्वानांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ एप्रिल, २०१४ ते नोव्हेंबर, २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्पदंश ९६१, विंचूदंश २९८३ आणि श्वानदंशाच्या २१५३ अशा एकूण ६०९७ घटना जिल्ह्यात घडल्या आहेत़ पावसाळ्यानंतर भातशेती कापणीच्या वेळी विंचू, सरपटणारे प्राणी बाहेर पडण्याची संख्या मोठी असते. यावेळी शेतकऱ्यांना विंचूदंश, सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कापणीच्या कालावधीत विंचू, सर्पदंशाचे रुग्ण मोठ्या संख्येने असतात. अशावेळी शासकीय रुग्णालयात असे रुण सर्रासपणे येत असतात.त्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विंचू, सर्प दंशावरील लस उपलब्ध आहे. त्यामुळे वेळीच उपचार करण्यात येत असल्याने जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सर्पदंश आणि विंचू तसेच श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. सर्पदंशाचे प्रमाण त्यामानाने कमी असले तरी श्वान आणि विंचूदंशाचे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जास्त असल्याचे दिसून येत आहे.