शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गुरूजींकडून वसुली

By admin | Updated: July 28, 2015 00:32 IST

बोगस पदवी : तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांना मात्र अभय--लोकमतचा प्रभाव

रत्नागिरी : अलाहाबाद विद्यापीठाच्या पदावनत केलेल्या २६ पदवीधर शिक्षकांकडून पदोन्नतीने झालेल्या वेतनातील वाढीव रक्कम वसूल करावी, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिक्षण विभागाला दिला आहे. जिल्हा परिषदेच्या शेकडो शिक्षकांनी परराज्यातील विद्यापीठांच्या बी. ए., बी. एड.च्या पदव्या धारण केल्या आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवला होता. त्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली होती. अल्प काळात मिळणाऱ्या पदव्यांमुळे यांचे वाटप करणारेही मालामाल झाले आहेत. उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक व अन्य राज्यांतील विद्यापीठाच्या पदव्यांचा त्यामध्ये समावेश आहे. अन्य राज्यांतील विद्यापीठाच्या पदव्यांच्या आधारे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या शिक्षकांनी पदोन्नती मिळवली होती. अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीधरांना देण्यात आलेल्या पदोन्नतीचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभेत, स्थायी समितीच्या सभेत जोरदारपणे गाजले होते. या पदव्यांच्या माध्यमातून पदवीधर, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारीपदापर्यंत ५१ उपशिक्षकांनी मजल मारली होती. त्यांना पदावनत करावे, असा ठराव शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आला होता. या पदवीधरांबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन केली होती. तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांच्या पदव्या तपासणीचे आदेशही देण्यात आले होते. अलाहाबादसह अन्य राज्यातील पदवीधर शिक्षकांचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला होता. त्यानुसार या समितीने त्या सर्व पदवीधरांना बोलावून पुन्हा कागदपत्रांची पाहणी केली. त्यामध्ये अलाहाबाद व हिंदी विद्यापीठाच्या ५१ पदवीधरांपैकी २६ शिक्षकांनी बी. ए. व बी. एड. पदवी या विद्यापीठातून घेतल्याचे स्पष्ट झाले. त्या सर्व पदवीधरांना पदावनत करण्यात आले, तर अन्य २५ पदवीधरांची बी. ए. पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची असून, बी. एड. पदवी अलाहाबाद विद्यापीठाची असल्याचे कागदपत्रांवरुन आढळून आले. या २५ पदवीधरांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. एड. पदवी मिळवण्यासाठी पाच वर्षांची मुदत देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घेतला. पदावनत करण्यात आलेल्या त्या जिल्हा परिषदेच्या २६ शिक्षकांची पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यापासून मिळालेल्या वेतनवाढीतील वाढीव रक्कम वसूल करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (शहर वार्ताहर)परराज्यांतील पदव्यांच्या आधारे उपशिक्षकांना पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी पदापर्यंत पदोन्नती देणाऱ्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई होणार की, त्यांना या प्रकरणातून सहीसलामत सोडणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असतानाच तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांना अभय कशासाठी, अशीही चर्चा शिक्षकवर्गात सुरु आहे.