शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
5
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
6
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
7
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
8
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
9
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
10
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
11
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
12
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
13
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
14
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
15
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
16
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
17
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
18
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
19
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
20
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीला जागतिक दर्जाचे निर्यात केंद्र बनवून नवी ओळख देणार : डॉ. बी. एन. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने इतर देशात निर्यात व्हावीत या दृष्टिकोनातून एक जागतिक दर्जाचे निर्यात केंद्र विकसित करण्याचा आराखडा ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने इतर देशात निर्यात व्हावीत या दृष्टिकोनातून एक जागतिक दर्जाचे निर्यात केंद्र विकसित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्याला नवीन ओळख मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या स्वरूपाचे निर्यात केंद्र रत्नागिरीत निर्माण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. बी. एम. पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात ‘आजादी का अमृत महोत्सव-७५’ स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत Exporters' Conclaves (निर्यातदारांचे संमेलन) व रत्नागिरी जिल्ह्यातील निर्यात होणारी उत्पादने व सेवा यांच्या प्रदर्शनाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, जिल्हा अग्रणी प्रबंधक एन. डी. पाटील, पणन विभागाचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, उद्योजक अमर देसाई, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, आंबा, काजू, कोकम व त्यांची उत्पादने तसेच जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभल्याने समुद्री उत्पादने यांना जागतिक बाजारात निर्यातीसाठी मोठा वाव आहे. स्थानिक ठिकाणी उपलब्ध ही उत्पादने आणखी विकसित करून त्यांची इतर देशांमध्ये निर्यात आणखी वाढविणे शक्य आहे. त्यामुळे येथे रोजगार निर्मितीही होईल आणि निर्यात वाढल्याने येथील उद्योजकांबरोबर जिल्ह्यालाही त्याचा फायदा होईल. जिल्ह्यातील बचत गटांमार्फत तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांच्या निर्यातीसाठीदेखील मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या बचत गटांची उत्पादने एकत्र करून, निर्यातदार तयार करून त्यांच्यामार्फतही जिल्ह्यातील निर्यात वाढवून जिल्ह्याला त्याचा फायदा होऊ शकेल, असेही ते म्हणाले. स्थानिक नवउद्योजकांना उत्पादने निर्यातीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देऊन त्यांच्यातूनही नवीन निर्यातदार तयार होतील, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाव्यवस्थापक संतोष कोलते यांनी Ratnagiri District Export Action Plan चे सादरीकरण यावेळी केले. आंबा निर्यातीसंदर्भात मार्गदर्शन करताना पणन विभागाचे मिलिंद जोशी यांनी निर्यात करणे किती महत्त्वाचे आहे, ते का महत्त्वाचे आहे, त्याचे होणारे फायदे, कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, आदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.