शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : फळपीक परताव्याची प्रतीक्षाच

By admin | Updated: September 23, 2014 23:56 IST

विमा कंपन्यांची दिरंगाई : जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

रत्नागिरी : हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली. परंतु या विमा कंपन्यांकडून अद्याप विमा परतावा जाहीर न केल्याने जिल्ह्यातील ३ हजार २८३ शेतकरी वंचित राहिले आहेत. ४०,९१४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला होता. परंतु विमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे शेतकरीवर्ग अद्याप प्रतीक्षेत असलेला दिसून येत आहे.हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली. समुद्र किनाऱ्यापासून १५ किलोमीटरच्या आतील अंतरावर महसूल मंडलांमध्ये ही योजना राबवण्यात आली. रत्नागिरी, पावस, खेडशी, जयगड, फणसोप, कोतवडे, मालगुंड, तरवळ, पाली या नऊ महसूल मंडलामध्ये योजना कार्यान्वित करण्यात आली. अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेडतर्फे कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना सक्तीची करण्यात आली होती. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक होती. जिल्ह्यातील २९४८ हेक्टर आंबा क्षेत्रावरील ३,१७० शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. ११,४३४ हेक्टर काजू क्षेत्रावरील ११३ लाभार्थी शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेतला होता. वास्तविक यावर्षी विमा योजनेसाठी केवळ मर्यादित कालावधी देण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद लाभला नाही. कृ षी अधिकाऱ्यांकडे धाव घेतलेल्या शेतकऱ्यांचेच अर्ज भरुन घेण्यात आले होते. १८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर इतकाच कालावधी देण्यात आल्याने शेतकरी उपेक्षित राहिले.फळपीक विमा संरक्षण कालावधी निर्धारित केलेल्या वेळेत अधिक तापमान, अवेळीचा अधिक पाऊस, नीच्चांकी तापमान या गोष्टींवर आधारित विमा योजना लागू करण्यात आली. हवामानावर आधारित फळपिकांवर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे उद्दिष्ट असतानासुद्धा ज्या शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेतला त्यांना अद्याप परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. आंब्याचा हंगाम लोटून चार महिने झाले तरीदेखील विमा कंपन्यांकडून शून्य प्रतिसाद दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये या योजनेबद्दल शंका निर्माण झाली आहे.विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी नॉट रिचेबल आल्याने एकूणच या विमा योजनेविषयी शेतकरीवर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)३ हजार २८३ शेतकरी वंचित कोकणातील आंबा बागायतदारांना हवामानाचा फटका बसतो. या हवामानामुळे शेतकरी, बागायतदार चिंतेत सापडतो. त्याला विम्याचे सुरक्षा कवच देण्याच्या हेतूने सुरू झालेल्या विमा परताव्यातच आता हा बागायतदार अडकला असून, अनेक शेतकरी वंचितच राहिले आहेत.समुद्र किनाऱ्यापासून १५ किलोमीटरच्या कक्षेत ही योजना राबविली जाणार.४१ हजार हेक्टर क्षेत्राचा काढला होता विमा. ९ महसुली मंडलात योजना केली होती कार्यान्वित.कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना होती सक्तीची. महिनाभराचाच कालावधी दिल्याने अनेक शेतकरी योजनेपासून उपेक्षित. ४ महिन्यानंतरही विमा कंपन्यांकडून प्रतिसाद नाही.शेतकरीवर्गामध्ये योजनेबाबत शंका उपस्थित. शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात अपयश.