शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

रत्नागिरी : कोकण रेल्वेमुळे एस. टी.चा फायदा, सर्वाधिक ७२७ जादा गाड्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 4:55 PM

कोकण रेल्वेत मंगळवारी झालेल्या गोंधळात एस्. टी. महामंडळाचा फायदा झाला आहे. मंगळवारी रेल्वेचे प्रवासी एस्. टी.कडे वळल्याने जादा गाड्यांच्या वेळापत्रकापेक्षा तब्बल ६१ आणखी जादा गाड्या मुंबईकडे मार्गस्थ झाल्या.

ठळक मुद्देकोकण रेल्वेमुळे एस. टी.चा फायदासर्वाधिक ७२७ जादा गाड्या रवाना

रत्नागिरी : कोकण रेल्वेत मंगळवारी झालेल्या गोंधळात एस्. टी. महामंडळाचा फायदा झाला आहे. मंगळवारी रेल्वेचे प्रवासी एस्. टी.कडे वळल्याने जादा गाड्यांच्या वेळापत्रकापेक्षा तब्बल ६१ आणखी जादा गाड्या मुंबईकडे मार्गस्थ झाल्या.गौरी-गणपतींच्या विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी एस. टी.च्या ६६६ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये रत्नागिरीच्या प्रवाशांना पायही ठेवायला जागा नसल्याने अनेक प्रवाशांनी अखेर एस. टी.कडे मोर्चा वळवला. त्यामुळे मंगळवारी एका दिवसात एस. टी.च्या ७२७ गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या.गौरी - गणपतीसाठी मुंबई व उपनगरांतून २२२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २ हजार ६९ गाड्या आल्या होत्या. मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, कोकण रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नसल्यामुळे प्रवासी अखेर एस. टी.कडे वळले असल्याने एस. टी.च्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.कोकण रेल्वेच्या गाड्या सिंधुदुर्गातूनच भरून येत असल्यामुळे पॅसेंजर गाड्यातही जागा मिळत नाही. आरक्षण असूनही बसायला जागा मिळत नसल्याचे रेल्वे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या गर्दीत निभाव लागणार नसल्यामुळेच प्रवाशांनी एस. टी. प्रवासाला पसंती दर्शविली आहे.

मंगळवारी एस. टी.च्या ६६६ गाड्यांचे आरक्षण असतानाच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे महामंडळाने आणखी ६१ जादा गाड्या सोडल्या. बुधवारसाठी ४२७ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे ४५० गाड्या सोडण्यात आल्या.

प्रवाशांच्या मागणीनुसार एसटीने जादा गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रत्नागिरीविभागातील सर्व आगारातून जादा गाड्यांना मागणी वाढली. त्यामुळे एकाच दिवशी ६१ जादा गाड्या सोडण्यात आल्या. बुधवारी देखील २५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी एसटी प्रशासन जादा गाड्यांची उपलब्धता करून देणार आहे.- अनिल मेहतर, विभागनियंत्रक, रत्नागिरी

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी