शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा ७४०२ लोकांची पाण्यासाठी वणवण, शासनाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:04 PM

रत्नागिरी जिल्ह्यात २९ गावातील ५६ वाड्यांमधील ७४०२ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्दे २९ गावातील ५६ वाड्यांमध्ये पाणीटंचाईकेवळ ९ टँकर्सद्वारे होतोय अपुरा पाणीपुरवठा

रत्नागिरी : जिल्ह्यात २९ गावातील ५६ वाड्यांमधील ७४०२ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत.टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून, पाण्याची पातळी खालावली आहे. जिल्ह्यात गतवर्षी या दिवसांमध्ये ७८ गावातील १३५ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती.

या टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करताना शासनाची दमछाक झाली होती. मात्र, गतवर्षीची पाणी टंचाईची स्थिती पाहता यंदाची संख्या निम्म्यावर आली आहे. तरीही लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे.मागील आठवड्यामध्ये जिल्ह्याच्या ४ तालुक्यांमध्ये २६ गावातील ५२ वाड्यांना भीषण पाणीटंचाई जाणवत होती़ त्यामध्ये खेडमध्ये १२ गावातील २१ वाड्यांमध्ये, चिपळुणातील ९ गावातील २२ वाड्यांमध्ये, संगमेश्वरात २ गावातील ६ वाड्यांना आणि लांजात ३ गावातील ३ वाड्यांचा समावेश होता.

या टंचाईग्रस्तांना प्रशासनाकडून ८ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात होता. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्म्याचा परिणाम येथील पाणीसाठ्यावर होत असून, टंचाईग्रस्तांची संख्या वाढत आहे.

चालू आठवड्यात खेड तालुक्यामध्ये २ गावातील ३ वाड्यांची, तर संगमेश्वरमध्ये १ एका गावातील एका वाडीची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना शासनाकडून केवळ ९ टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत आहे.पाण्यासाठी भटकंतीदरवर्षी पाणीटंचाई उद्भवते़ या टंचाईग्रस्तांमध्ये धनगरवाड्यांचा समावेश आहे़ डोंगरदऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.जनावरे तडफडू लागलीजनावरांना देण्यासाठी पाणी नसल्याने ती तडफडू लागली आहेत़ उन्हामुळे पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, ओढे, नाले आटल्याने ही परिस्थिती ओढवली.तीव्रता जास्तगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईचे प्रमाण कमी असले तरी तीव्रता मात्र जास्त आहे. खेड तालुक्यात तर काही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी