शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रमाई आवास योजनेतील ‘घरकुलां’चा निधी नाही

By admin | Updated: February 18, 2015 00:55 IST

योजनेला ‘अर्थ’ नाही : गरिबांची घरे उभी राहण्यात अडचणी; अनेक बांधकामे अपूर्ण

रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेंतर्गत ‘घरकुलांचा’ निधी प्राप्त झाला नसल्यामुळे लाभार्थींची फरपट होत आहे. बहुतांश ठिकाणी घरकुलांचे बांधकाम निधीअभावी अपूर्ण राहिले आहे. शासनाकडून मागासवर्गीयासांठी विशेषत: दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांकडून रमाई आवास योजनेसाठी प्रस्ताव मागवण्यात येतात. या योजनेंतर्गत नेवरे येथील चार लाभार्थींचे ‘घरकूल’ योजनेसाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थींनी सप्टेंबरमध्ये घरकुलांचे काम सुरू केले. एका घरकुलासाठी एक लाख रूपये खर्च केला जातो. पैकी पाच हजार लाभार्थीचे तर ९५ हजार रूपये शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. नोव्हेंबरमध्ये संबंधित लाभार्थींना ग्रामपंचायतीतर्फे निधीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला. चार लाभार्थींना प्रत्येकी ३५ हजार रूपये याप्रमाणे पैसे देण्यात आले. पहिला हप्ता मंजूर झाल्यानंतर लाभार्थींनी घराच्या चौथऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. त्याची छायाचित्र काढून ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे पाठविण्यात आली. नजीकच्या काळात पैसे मिळणारच आहेत, त्यामुळे सुरू असलेले काम न थांबवता काही लाभार्थींनी भिंतीचे कामही सुरू केले आहे. मात्र, निधी उपलब्ध नसल्यामुळे बांधकाम रखडले आहे. गेल्या तीन महिन्यात शासनाकडून रमाई आवास योजनेंतर्गत निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी सातत्याने ग्रामपंचायतीमध्ये फेऱ्या घालत आहेत. ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे संपर्क साधण्यात येत आहे. मात्र, पंचायत समितीकडे अद्याप निधी प्राप्त झाला नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. निधी उपलब्ध झाल्यास वितरीत केला जाईल, असेही सांगण्यात येत आहे. वास्तविक घरकूल योजनेसाठी प्रस्तावांची निवड निकषानुसार केली जाते. गोरगरीब मंडळींना घरकुलासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु अशा प्रकारे निम्यापेक्षा कमी निधी पहिला हप्ता म्हणून वितरीत केला जात असेल, तर उर्वरित निधीचे काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे. पूर्ण निधी उपलब्ध झाला नसेल तर वरिष्ठ पातळीवरून ग्रामपंचायतींना सूचना देणे आवश्यक आहे. जेणेकरून गोरगरीब जनतेला त्याचा त्रास झाला नसता. घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरीब लाभार्थींना अपूर्ण बांधकाम असलेल्या घराकडे पाहून अश्रू गाळावे लागत आहेत. शिवाय शासनाच्या गलथान कारभाराविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. माता रमाई आवास योजना संपूर्ण जिल्हाभर राबवण्यात येते. स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करून लाभार्थींना उर्वरित निधी मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात येतआहे. हा निधी जर लवकर उपलब्ध झाला नाही तर अडचणीत भरच पडणार आहे. (प्रतिनिधी)