शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

किनारपट्टी स्वच्छतेमागे लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची बीजे पेरणे हा उद्देश : सचिन सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

रत्नागिरी : भारतीय किनारपट्टीवर स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यामागचा उद्देश केवळ समुद्रकिनारे स्वच्छ करणेच नव्हे तर किनारपट्टीचे क्षेत्र समुद्री ...

रत्नागिरी : भारतीय किनारपट्टीवर स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यामागचा उद्देश केवळ समुद्रकिनारे स्वच्छ करणेच नव्हे तर किनारपट्टीचे क्षेत्र समुद्री प्रदूषण, कचऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सागरी परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी सामान्य लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा आहे, असे प्रतिपादन भारतीय तटरक्षक दलाचे उप समादेशक सचिन सिंग यांनी केले.

येथील भारतीय तटरक्षक दलातर्फे शनिवारी रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये बीचवर आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे आयोजन केले होते. यावर्षी कार्यक्रमाचे उद्दिष्ट लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची बीजे पेरणे आणि समुद्रकिनाऱ्यांवर पर्यावरणाचे नाजूक संतुलन अबाधित राखणे हे होते. संगीता कुमार (उपाध्यक्ष, तटरक्षक, रत्नागिरी) यांच्या हस्ते ध्वज दाखवून भाट्ये बीच येथे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक उप समादेशक सचिन सिंग यांनी या मोहिमेबद्दल माहिती करून देताना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व सांगितले. भारतीय तटरक्षक दल यानिमित्ताने २००५ सालापासून भारतीय किनारपट्टीवर अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

भारतीय तटरक्षक दल, सैन्य अभियंता सेवा, सागरी पोलीस, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) आणि नगर परिषदेचे कर्मचारी स्वयंप्रेरणेने या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभागी झाले होते. प्रामुख्याने प्लास्टिकच्या बाटल्या, टिन, जाळी, दोरखंड, खाद्यपदार्थांचे रॅपर आदी स्वरूपाचा एकूण १.५ टन कचरा संकलन करण्यात आला.

भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक नीरज सिंग, उपमहानिरीक्षक दुष्यंत कुमार, कर्नल विश्वास पी. यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. उपक्रम पार पाडताना कोरोनाच्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्यात आले होते.

.....

फोटो मजकूर

रत्नागिरीतील तटरक्षक दलातर्फे रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्र किनाऱ्यावर शनिवारी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत दीड टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.