शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक करताहेत गणिताचा अभ्यास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सागर पाटील / टेंभ्ये : कोविड-१९ चा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांमध्ये होऊ नये यासाठी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सागर पाटील / टेंभ्ये : कोविड-१९ चा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांमध्ये होऊ नये यासाठी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा शासन स्तरावरून रद्द करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची मूल्यमापन पद्धत नुकतीच जाहीर केली आहे. सध्या राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बारावीचे मूल्यमापन सुरू आहे. हे मूल्यमापन तंत्र प्राध्यापकांसाठी डोकेदुखी ठरत असून सरासरी, शेकडा गुण आणि टक्केवारी या गणितातील अवघड संकल्पनांची पुन्हा एकदा प्राध्यापकांना उजळणी करावी लागत आहे.

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या मूल्यमापन तंत्रामध्ये दहावी, अकरावी व बारावीमधील गुणांना भारांश देण्यात आला आहे. मूल्यमापन तंत्रामध्ये सरासरी, शेकडेवारी व टक्केवारी या गणितामधील कठीण संकल्पनांचा समावेश असल्याने प्राध्यापकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

----------------------

नियमित विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या वर्गांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या तीन विषयांतील गुणांच्या बेरजेला ३ ने भागून त्याची सरासरी १०० गुणांपैकी काढावयाची आहे. या सरासरीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांना ३० टक्के भारांश दिला देण्यात आला आहे. त्याचे रूपांतर २४ पैकी गुणांमध्ये करावयाचे आहे. त्यानंतर अकरावीच्या वर्गामध्ये प्रत्येक विषयाला प्राप्त झालेल्या १०० पैकी गुणांना ३० टक्के भारांश देण्यात आला असून, त्याचे रूपांतर २४ पैकी गुणांमध्ये करावयाचे आहे. तसेच बारावीचे वर्षभरातील प्रथमसत्र, सराव परीक्षा, सराव चाचण्या अथवा तत्सम मूल्यमापनासाठी निर्धारित केलेल्या एकूण गुणांपैकी प्राप्त गुणांना ४० टक्के भारांश देण्यात आला असून त्याचे रूपांतर ३२ पैकी गुणांमध्ये करावयाचे आहे. अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण निश्चित करण्यात आले आहेत. या पद्धतीने नियमित विद्यार्थ्यांसाठी १०० गुण निश्चित करण्यात आले आहेत.

------------------------------

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन तंत्रात बदल करण्यात आला आहे. दहावीच्या वर्गांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या तीन विषयांतील गुणांच्या बेरजेला ३ ने भागून त्याची सरासरी १०० गुणांपैकी काढावयाची आहे. या सरासरीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांना ५० टक्के भारांश देण्यात आला आहे. तसेच अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी २० गुणांची तरतूद करण्यात आली आहे. शाखानिहाय या गुणांमध्ये बदल होत असल्याचे पाहायला मिळते. यापूर्वीच्या बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेतील गुणांचा तपशील मंडळाला स्वतंत्रपणे कळवायचा आहे. उर्वरित ३० गुण उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे मंडळाकडून देण्यात येणार आहे. खासगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी व एम.सी.व्ही.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मूल्यमापन तंत्र तयार करण्यात आले आहे.