शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आराखडा तयार

By admin | Updated: February 18, 2015 00:54 IST

राजापूर तालुका: निधीची उपलब्धता होणे आवश्यक

राजापूर : मागील काही वर्षांत वेळेवर पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार न झाल्याने वेळेवर निधी मिळाला नाही आणि टँकरने पाणी पुरवठा करणे महाकठीण ठरले. मात्र, यावर्षी राजापूर पंचायत समिती प्रशासनाने वेळेवर टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३८ गावे व ७८ वाड्यांना ३ कोटी ७५ लाख १० हजार अंदाजीत खर्च अपेक्षित आहे. या आराखड्यात ताम्हाणे चव्हाणवाडी, धनगरवाडी, शेंडेवाडी, पळसमकरवाडी, मोरोशी, तळेवाडी, टेंबवाडी, खरवते वाणेवाडी, धनगरवाडी, हसोळतर्फे सौंदळ, कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, विठ्ठलवाडी, कारवली, गाववाडी बौद्धवाडी, वरचीवाडी, केळवली मोसम, झर्ये धनगरवाडी, जवळेथर धावडेवाडी, मावळतवाडी, ताम्हाणे, चव्हाणवाडी धनगरवाडी, पेड्ये - गुरववाडी, पहिलीवाडी (मधलीवाडी), शेंडेवाडी, कळसवली पळसमकरवाडी, कोष्टेवाडी, गोठणे दोनिवडे, हातणकरवाडी बौद्धवाडी, साखरकरवाडी, गो. दो. शाळा क्र. १ किंजळवणे, नाचणेकर वाडी, नेरकेवाडी क्र. ३, हातणकरवाडी, तांबळवाडी, हुंबरवाडी, हातणकरवाडी कडे कुडकुडवाडी, दळवीवाडी, साखरीनाटे, प्रादेशिक योजना मोरोशी तळेवाडी, टेंबवाडी, आंगले, साळसरकरवाडी, खरवते वाणेवाडी, हसोळतर्फे सांैदळ कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, तळवडे जंगमवाडी, ब्राह्मणदेव धनगरवाडी, कारवली, विठ्ठलवाडी, गाववाडी बौद्धवाडी, वरचीवाडी, कोंड्येतर्फे राजापूर गाडगीळवाडी महाळुंग धनगरवाडी, पांगरी बुद्रुक बागवाडी, केळवली, कुंभवडे, हरचलीवाडी, मधलीवाडी बौद्धवाडी, रामणवाडी, भरडवाडी, देवाचे गोठणे, सोंड्येवाडी, मयेकरवाडी, कातळीवाडी, धाऊलवल्ली, सोंड्येवाडी, पोकळेवाडी, मधला वठार, रूमडे वठार, पाखाडी, खरवते बौद्धवाडी, दोनिवडे धनगरवडी, तळवडे धनगरवाडी, झर्ये धनगरवाडी, कोदवली धनगरवाडी, मांडवेवाडी, मांडवकरवाडी शाळा नं. २ पाथर्डे धनगरवाडी, धोपेश्वर तिथवली धनगरवाडी, चिखले धनगरवाडी, बारसू धनगरवाडी शाळा, पांगरे बु. गावमळा, धावडेवाडी, मावळतवाडी, मूर चिखलेवाडी, मुरवाळवड करक आंबा, जांभळवाडी, मधलीवाडी, तांबळवाडी, चिखलगाव, ठिकावडी, सुर्वेवाडी, वाटुळ म्हादयेवाडी, गोळवाडी, कोेंड्येतर्फे सौंदळ तांबळवाडी बौद्धवाडी, अजिवली बाणेवाडी बौद्धवाडी, वाडापेठ, धावडेवाडी, प्रिंदावण, तळेखाजण, कणेरे बौद्धवाडी, हातदे पाटीलवाडी, शीळ वरचीवाडी, कोल्हेवाडी असा समावेश असून बहुतांशी वाड्यांमध्ये धनगरवाडे व बौद्धवाड्या यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विंधन विहिरी नळपाणी योजनांची दुरुस्ती करणे तात्पुरती पुरक नळयोजना घेणे, खासगी विहिरी अधिग्रहीत करणे, टँकरने, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, असा १ आॅक्टोबर २०१४ ते ३० जून २०१५ संकलित आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे. अखेरच्या टप्प्यात याव्यतिरिक्त संभाव्य गावे व वाड्या या कोणत्या असतील, त्याचा अंदाज घेऊन हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. निधीची तरतूद झाल्यास टंचाईग्रस्त गावे व वाड्यांवर पाण्याचे टँकर पोहचू शकतील, याची खबरदारी घेणे प्रशासनावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. (प्रतिनिधी)