शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची गैरसोय कायमची संपण्याची शक्यता

By admin | Updated: January 15, 2015 23:35 IST

दापोलीत दोन पूल : गैरसोय संपणार, १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

आंजर्ले : दापोली शहरातील केळसकर नाक्याच्या अलिकडे दापोली - हर्णै रस्त्यावरच्या दोन अरूंद व जीर्ण झालेल्या पुलांमुळे होणारी गैरसोय आता लवकरच थांबणार आहे. दोन नवीन रूंद पूल उभारण्यासाठी १ कोटी २० लाखाचा निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. दापोली शहराचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. शहराच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत. दापोली शहर जालगाव, गिम्हवणे, मौजे दापोली, टाळसुरे या लगतच्या गावांना कधीच जोडले गेले आहे. शहराचा होणारा विस्तार व वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन शहरातील मुख्य दापोली बसस्थानक ते मेहंदळे आश्रम व खोंडा ते हॉटेल जयंत-पद्मजा या रस्त्याचे रूंदीकरण पूर्ण झालेले आहे. मात्र, बसस्थानक ते मेहंदळे आश्रम या दापोली-हर्णै रस्त्यावरच्या झालेल्या रूंदीकरणात एक समस्या निर्माण झाली होती. निधीअभावी केळसकर नाक्याजवळ जोग नदीवरील दोन जुने पूल तसेच ठेवण्यात आले होते. ९ मीटरपेक्षा जास्त रूंद रस्ता व मध्येच ५ मीटरपेक्षा कमी रूंदीचे दोन पूल यामुळे मूळ रूंदीकरणाचाच हेतू अपूर्ण राहिला होता. या अरूंंद पुलांमुळे रूंदीकरण करूनही काहीच फायदा होत नव्हता. उलट अशा पुलांमुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यातच हे दोन्ही अरूंद पूल जीर्ण झाले होते. आता या दोन पुलांमुळे होणारी गैरसोय लवकरच थांबणार आहे. या दोन पुलांसाठी प्रत्येकी ६० लाख रूपये असा १ कोटी २० लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाची निविदा प्रसिध्द होऊन याचा ठेका एका प्रतिष्ठीत कॉन्टॅ्रक्टरला देऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. हे दोन पूल नव्याने बांधले नाहीत, तर रस्ता रूंदीकरण करूनही काहीच फायदा होणार नाही. उलट अपघातांचे प्रमाण वाढेल, असे मुद्दे माजी पालकमंत्री भास्कर जाधव दापोली नगरपंचायत निवडणूक होण्याआधी दापोलीत आले असता मांडले गेले. त्यावेळी भास्कर जाधव यांनी या कामाकडे लक्ष देईन व निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले होते. त्यांनी पाळले आहे. याबाबत करण्यात आलेला पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभाग, दापोलीचे उपअभियंता सुब्बुराज यांनी तातडीने दिलेली कागदपत्र व तांत्रिक बाजूंची पूर्तता यामुळे ही समस्या आता मार्गी लागली आहे.दोन पूल नव्याने होणार असल्याने रस्ता रूंदीकरणानंतर विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही पुलांच्या उभारणीसाठी निधीची तरतूद झाल्याने परिसरातील बहुतांश लोकांची गैरसोय दूर होणार आहे. यापूर्वी अरूंद पुलामुळे रूंदीकरण होऊनही त्याचा फायदा वाहनाना होत नव्हता व गैरसोय होत होती. मात्र, आता ही गैरसोय दूर होणार आहे.केळसकर नाक्याजवळ जोग नदीवरील दोन जुने पूल तसेच ठेवण्यात आले होते. हे दोन पूल तसेच राहिल्याने मूळ रूंदीकरणाचा हेतू अपूर्ण राहिला होता आता तो पूर्ण झाला आहे. (वार्ताहर)